शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष उलटले, मात्र मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

मागील वर्षी २५ मार्चपासून ३१ दिवसांचा व त्यानंतर दोन महिन्यांचा लाॅकडाऊन हाेता. यामुळे मत्स्य व्यवसायाशी निगडित मच्छीमार संस्थांचे नुकसान ...

मागील वर्षी २५ मार्चपासून ३१ दिवसांचा व त्यानंतर दोन महिन्यांचा लाॅकडाऊन हाेता. यामुळे मत्स्य व्यवसायाशी निगडित मच्छीमार संस्थांचे नुकसान झाले. संबंधित संस्था सभासदांना धान्य उत्पादकाप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे विभागीय आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाने जाहीर केले हाेते. यासंदर्भात ३१ मार्च २०२० राेजी साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) गडचिरोली यांच्यामार्फत जिल्ह्यातील ८६ संस्थांना पत्रही पाठविण्यात आले. सदर पत्रात मत्स्य संस्थांच्या सक्रिय सभासदांचे पूर्ण नाव, आधार कार्ड व बँक खाते तत्काळ मागून संबंधित सभासदांच्या खात्यात आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. परंतु वर्ष उलटूनही मच्छीमार बांधवांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

बाॅक्स

धान उत्पादकांप्रमाणे भरपाई द्या

मागील वर्षीपासून काेराेना विषाणूचा संसर्ग पसरत आहे. संसर्गामुळे मच्छीपालन संस्थांची मासेमारी थांबली. सध्या जलसाठा कमी झाल्याने मत्स्यबीज तलाव आटून बीज मृत्युमुखी पडले आहेत. शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई देते, त्याप्रमाणे शासनाने ठरविल्याप्रमाणे धान उत्पादकांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वैरागड मच्छीपालन संस्थेचे अध्यक्ष रोहिदास दुमाने, सदस्य कुंडलिक धनकर, विनोद कांबळे, कमला मेश्राम, विजय जराते खुशाल पंडेलगोत, मुन्ना मानकर, गोमाजी भोयर व संस्थेचे सचिव गजानन धनकर यांनी केली आहे.

===Photopath===

160521\16gad_6_16052021_30.jpg

===Caption===

नुकसान भरपाईबाबत शासनाने संस्थाना दिलेले पत्र दाखविताना पदाधिकारी.