शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

यावर्षीही २६३ गावांना पावसाळी ‘नवसंजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. ...

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्याला प्रतिकार्ड १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ, तर प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांला प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याप्रमाणे वाटप केले जाते. या परिमाणानुसार चार महिन्याचे धान्य संबंधित तालुक्याच्या शासकीय गोदामात पोहोचविण्यात आले. तेथून ते रेशन दुकानापर्यंत पोहोचविले जात आहे.

काही तालुक्यात रस्त्याची कामे अर्धवट असल्यामुळे त्या मार्गावरून वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे यावर्षी गावांची संख्या वाढल्याचे अधिकारी सांगत आहेत.

बाधित गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली

ग्रामीण भागात रस्ते व पुलांचे जाळे दरवर्षी विणले जाते. त्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांची संख्या दरवर्षी कमी होणे अपेक्षित आहे. परंतू प्रत्यक्षात यावर्षी ही संख्या वाढल्यामुळे यामागील रहस्य काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्यावर्षी पुरवठा विभागाने नवसंजीवनी योजनेतून २५२ गावांना धान्य पुरवठा केला होता. यावर्षी त्यात वाढ होऊन २६३ गावांना धान्य पुरवठा केला जात आहे. यामुळे गेल्या वर्षभरात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी आणखी बिघडली का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

योजनेचा लाभ मिळणारी गावे

तालुका संपर्क तुटणारी गावे रेशन दुकाने पोहोचलेले धान्य

धानोरा ३८ १६ ९

मुलचेरा ६ ३ ३

अहेरी ५८ २६ १२

भामरागड ५९ २२ २०

एटापल्ली ७४ ३७ २२

सिरोंचा २८ २३ ९

एकूण २६३ १२७ ७५