शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

यावर्षीही २६३ गावांना पावसाळी ‘नवसंजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. ...

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्याला प्रतिकार्ड १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ, तर प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांला प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याप्रमाणे वाटप केले जाते. या परिमाणानुसार चार महिन्याचे धान्य संबंधित तालुक्याच्या शासकीय गोदामात पोहोचविण्यात आले. तेथून ते रेशन दुकानापर्यंत पोहोचविले जात आहे.

काही तालुक्यात रस्त्याची कामे अर्धवट असल्यामुळे त्या मार्गावरून वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे यावर्षी गावांची संख्या वाढल्याचे अधिकारी सांगत आहेत.

बाधित गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली

ग्रामीण भागात रस्ते व पुलांचे जाळे दरवर्षी विणले जाते. त्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांची संख्या दरवर्षी कमी होणे अपेक्षित आहे. परंतू प्रत्यक्षात यावर्षी ही संख्या वाढल्यामुळे यामागील रहस्य काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्यावर्षी पुरवठा विभागाने नवसंजीवनी योजनेतून २५२ गावांना धान्य पुरवठा केला होता. यावर्षी त्यात वाढ होऊन २६३ गावांना धान्य पुरवठा केला जात आहे. यामुळे गेल्या वर्षभरात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी आणखी बिघडली का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

योजनेचा लाभ मिळणारी गावे

तालुका संपर्क तुटणारी गावे रेशन दुकाने पोहोचलेले धान्य

धानोरा ३८ १६ ९

मुलचेरा ६ ३ ३

अहेरी ५८ २६ १२

भामरागड ५९ २२ २०

एटापल्ली ७४ ३७ २२

सिरोंचा २८ २३ ९

एकूण २६३ १२७ ७५