शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

तेंदू घटकांना यावर्षीही बसणार मंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:12 IST

तेंदूपानांच्या विक्रीवर यावर्षीही मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या तेंदू संकलनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पाहता वनविभागाने शासकीय संकलन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

ठळक मुद्देलिलावांना अल्प प्रतिसाद : वनविभागाकडून शासकीय संकलन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपानांच्या विक्रीवर यावर्षीही मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या तेंदू संकलनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. ही स्थिती पाहता वनविभागाने शासकीय संकलन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.राज्यात संकलित होणाऱ्या एकूण तेंदूपानांपैकी अर्धेअधिक तेंदूपानांची निर्मिती व संकलन गडचिरोली जिल्ह्यात होते. राज्यात आतापर्यंत पेसाव्यतिरिक्त भागातील ३ लाख २२ हजार ४३८ प्रमाण गोणींचे ई-टेंडरिंग करण्यात आले. त्याच्या आतापर्यंत पाच फेऱ्या झाल्या, पण ३० टक्क्यांपेक्षाही कमी तेंदू घटकांची (युनिट) विक्री झाली आहे. छत्तीसगड राज्यात तेंदूपानांचे ९०० घटक असून तेथील संकलन १४ लाख प्रमाण गोणींचे आहे. त्यापैकी आतापर्यंत ६ लाख प्रमाण गोणी ई-टेंडरिंगद्वारे विकल्या गेल्या आहेत. उर्वरित मानक बोऱ्यांची विक्री खुल्या लिलाव प्रक्रियेतून केली जात आहे. छत्तीसगड राज्य सरकारने तेंदूपाने तोडाईचा (संकलन) दर ४००० प्रति मानक बोरी असा दर निश्चित केला आहे. त्या तोडाई दरावरच घटकांची विक्री करण्याचे निश्चित केले आहे.अर्थात, रॉयल्टी न घेता मजुरांना मजुरी व रोजगार मिळाला पाहीजे, हा एकच उद्देश ठेवून त्यांनी संकलन दरात तेंदूपानांची विक्री करण्याचे धोरण राबविले आहे. यामुळे मजुरांना रोजगार मिळण्यासोबतच मजुरीही योग्य प्रमाणात मिळणार आहे. याउलट महाराष्ट्रात गेल्यावर्षीच्या हंगामात (२०१७-१८) जे तेंदू घटक विकल्या गेले नाहीत ते अनुत्पादित करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षाच्या हंगामात पेसाअंतर्गत ग्रामसभांनी लिलाव प्रक्रिया राबविल्यानंतरही खरेदीदारांनी तेंदूपाने घेतली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मजुरांना या व्यवसायातून मिळणाºया जवळपास १०० कोटी रुपयांच्या मजुरीपासून वंचित राहावे लागले.तेंदूपाने तोडाईचा हंगाम एप्रिल महिन्यापासून सुरू होतो. परंतू अजूनही ७० टक्के घटकांची विल्हेवाट लागली नसल्यामुळे मजुरांना यावर्षीसुद्धा मिळणाऱ्या मजुरी व इतर खर्चापोटी सव्वाशे कोटी रुपयांपासून वंचित राहावे लागू शकते, असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून निर्माण झाले आहे.शासनाने दिलासा द्यावाबिगर पेसा क्षेत्रातील घटक संकलन दरामध्ये विक्री न झाल्यास वनविभागामार्फत शासकीय संकलन करून दिलासा द्यावा, अशी मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी केली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील घटक विक्रीच्या संदर्भात प्रशासनाने वेगळी यंत्रणा राबवून तिथेसुद्धा तेंदू संकलन करण्यासंदर्भात १५ दिवसात उपाययोजना करावी. अन्यथा जिल्ह्यात असंतोषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता, त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :forest departmentवनविभाग