शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

यंदा पीक कर्जाचे लक्ष्यांक वाढले

By admin | Updated: May 30, 2014 00:04 IST

कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

दिलीप दहेलकर - गडचिरोलीकृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.  गत दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जाच्या वाटपाच्या उद्दिष्टात वाढ झाली असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामासाठी ५ हजार २७३ लाख व रबी हंगामासाठी ५00 लाख असे एकूण ५ हजार ७७३ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ हजार ४४२ व रबी हंगामासाठी ७६0 लाख असे एकूण ५ हजार २0२ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बँकांना खरीप हंगामासाठी १ हजार २६५ लाख तर रबी हंगामासाठी १६५ लाख असे एकूण १ हजार ४३0 लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.आदिवासीबहुल, मागास व उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून असते. यामुळे जिल्ह्यातील कृषी विकासाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे यंदा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली असून बँकांना शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही केल्या आहेत.गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत, मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून ९ हजार ९८0 लाख रूपयाचे पीक कर्ज वितरित केले. रबी हंगामासाठी या सर्व बँका मिळून गतवर्षी १ हजार २९७ लाख रूपयाचे कर्ज वितरित केले. जिल्ह्यातील २९ हजार २८४ क्रेडिटधारक शेतकर्‍यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात वनपट्टे वाटप झाल्यामुळे शेतकर्‍यांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. होत असलेल्या कर्ज वाटपातून या शेतकर्‍यांनी खरीप व रबी पिकाची लागवड करून गेल्या काही वर्षात उत्पादन घेतले आहे. पीककर्ज उपलब्ध होऊन सहकारातून कृषी विकास काही प्रमाणात होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)