शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

यंदा पीक कर्जाचे लक्ष्यांक वाढले

By admin | Updated: May 30, 2014 00:04 IST

कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

दिलीप दहेलकर - गडचिरोलीकृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.  गत दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जाच्या वाटपाच्या उद्दिष्टात वाढ झाली असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामासाठी ५ हजार २७३ लाख व रबी हंगामासाठी ५00 लाख असे एकूण ५ हजार ७७३ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ हजार ४४२ व रबी हंगामासाठी ७६0 लाख असे एकूण ५ हजार २0२ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बँकांना खरीप हंगामासाठी १ हजार २६५ लाख तर रबी हंगामासाठी १६५ लाख असे एकूण १ हजार ४३0 लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.आदिवासीबहुल, मागास व उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून असते. यामुळे जिल्ह्यातील कृषी विकासाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे यंदा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली असून बँकांना शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही केल्या आहेत.गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत, मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून ९ हजार ९८0 लाख रूपयाचे पीक कर्ज वितरित केले. रबी हंगामासाठी या सर्व बँका मिळून गतवर्षी १ हजार २९७ लाख रूपयाचे कर्ज वितरित केले. जिल्ह्यातील २९ हजार २८४ क्रेडिटधारक शेतकर्‍यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात वनपट्टे वाटप झाल्यामुळे शेतकर्‍यांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. होत असलेल्या कर्ज वाटपातून या शेतकर्‍यांनी खरीप व रबी पिकाची लागवड करून गेल्या काही वर्षात उत्पादन घेतले आहे. पीककर्ज उपलब्ध होऊन सहकारातून कृषी विकास काही प्रमाणात होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)