शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पीक कर्जाचे लक्ष्यांक वाढले

By admin | Updated: May 30, 2014 00:04 IST

कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

दिलीप दहेलकर - गडचिरोलीकृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.  गत दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जाच्या वाटपाच्या उद्दिष्टात वाढ झाली असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामासाठी ५ हजार २७३ लाख व रबी हंगामासाठी ५00 लाख असे एकूण ५ हजार ७७३ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ हजार ४४२ व रबी हंगामासाठी ७६0 लाख असे एकूण ५ हजार २0२ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बँकांना खरीप हंगामासाठी १ हजार २६५ लाख तर रबी हंगामासाठी १६५ लाख असे एकूण १ हजार ४३0 लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.आदिवासीबहुल, मागास व उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून असते. यामुळे जिल्ह्यातील कृषी विकासाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे यंदा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली असून बँकांना शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही केल्या आहेत.गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत, मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून ९ हजार ९८0 लाख रूपयाचे पीक कर्ज वितरित केले. रबी हंगामासाठी या सर्व बँका मिळून गतवर्षी १ हजार २९७ लाख रूपयाचे कर्ज वितरित केले. जिल्ह्यातील २९ हजार २८४ क्रेडिटधारक शेतकर्‍यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात वनपट्टे वाटप झाल्यामुळे शेतकर्‍यांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. होत असलेल्या कर्ज वाटपातून या शेतकर्‍यांनी खरीप व रबी पिकाची लागवड करून गेल्या काही वर्षात उत्पादन घेतले आहे. पीककर्ज उपलब्ध होऊन सहकारातून कृषी विकास काही प्रमाणात होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)