शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

यंदा आम्ररसाची गोडी अविट राहणार!

By admin | Updated: February 16, 2015 01:26 IST

मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे.

वैरागड : मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे. सध्या ज्या पध्दतीने आंब्याना मोहोर आला आहे. त्यातील एक पाव हिस्सा इतकाच बहर फळात रूपांतर होईपर्यंत कायम राहिल्यास व निसर्गाची अवकृपा न झाल्यास यावर्षात गावठी आंब्याच्या रसाची गोडी अविट राहणार आहे. वैरागड परिसरात असलेल्या शेतशिवारातील तसेच आमराईतील आंब्याना बऱ्यापैकी मोहोर आलेला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निसर्गाने साथ दिल्यास साऱ्यानाच गावठी आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मात्र अस्मानी संकट असले की आंबे असेच बहरून येतात, असे जुने जाणकार सांगतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमराया अस्तित्वात होत्या. गावात आमराई नाही, असा गाव शोधूनही सापडणार नाही. मात्र आता गावात आमराई सापडणार नाही. पूर्वीच्या काळात गावागावांत गावठी आंब्याच्या मोठमोठ्या आमराया होत्या. बाहेर गावावरून मामाच्या गावाला जाणारे शाळकरी मुले या आमराईत जावून मनमुरादपणे खेळायचे बागळायचे तसेच दगडाने वार करून आंबे पाडायचे. परिश्रमाने आणलेल्या आंब्याची चवही त्या काळात अधिकच गोड होती. मात्र आता विकतच घ्यावे लागते.काही गावातील पिढीजात आमराया काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी अल्प आर्थिक मोबदल्यासाठी स्व मालकीच्या जागेतील आंब्याची झाडे कंत्राटदारांना विकली तर काहींनी विटा भाजण्यासाठी आंब्याच्या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला. त्यामुळे गाव खेड्यातील आमराया शेवटच्या घटका मोजत आहेत. गावातील आमरायाचा नष्ट झाल्या. त्यासोबतच आमरायातील पाखरांची चिवचिवाटही लोप पावत असल्याचे दिसून येते.