शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यंदा आम्ररसाची गोडी अविट राहणार!

By admin | Updated: February 16, 2015 01:26 IST

मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे.

वैरागड : मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे. सध्या ज्या पध्दतीने आंब्याना मोहोर आला आहे. त्यातील एक पाव हिस्सा इतकाच बहर फळात रूपांतर होईपर्यंत कायम राहिल्यास व निसर्गाची अवकृपा न झाल्यास यावर्षात गावठी आंब्याच्या रसाची गोडी अविट राहणार आहे. वैरागड परिसरात असलेल्या शेतशिवारातील तसेच आमराईतील आंब्याना बऱ्यापैकी मोहोर आलेला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निसर्गाने साथ दिल्यास साऱ्यानाच गावठी आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मात्र अस्मानी संकट असले की आंबे असेच बहरून येतात, असे जुने जाणकार सांगतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमराया अस्तित्वात होत्या. गावात आमराई नाही, असा गाव शोधूनही सापडणार नाही. मात्र आता गावात आमराई सापडणार नाही. पूर्वीच्या काळात गावागावांत गावठी आंब्याच्या मोठमोठ्या आमराया होत्या. बाहेर गावावरून मामाच्या गावाला जाणारे शाळकरी मुले या आमराईत जावून मनमुरादपणे खेळायचे बागळायचे तसेच दगडाने वार करून आंबे पाडायचे. परिश्रमाने आणलेल्या आंब्याची चवही त्या काळात अधिकच गोड होती. मात्र आता विकतच घ्यावे लागते.काही गावातील पिढीजात आमराया काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी अल्प आर्थिक मोबदल्यासाठी स्व मालकीच्या जागेतील आंब्याची झाडे कंत्राटदारांना विकली तर काहींनी विटा भाजण्यासाठी आंब्याच्या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला. त्यामुळे गाव खेड्यातील आमराया शेवटच्या घटका मोजत आहेत. गावातील आमरायाचा नष्ट झाल्या. त्यासोबतच आमरायातील पाखरांची चिवचिवाटही लोप पावत असल्याचे दिसून येते.