शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

यंदा दीडशे एकरवरील शेतजमीन राहणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:45 IST

सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परिणामी यंदा दीडशे एकरवर शेतजमीन पडिक राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देतुकूम शेतशिवारातील बंधारा पावसाच्या प्रवाहाने फुटला : धानपीक न घेण्याचा २५ ते ३० शेतकऱ्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परिणामी यंदा दीडशे एकरवर शेतजमीन पडिक राहण्याची शक्यता आहे.शासनाने शेतकºयांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने सिंचनाची सुविधा केली. धानोरापासून पाच किमी अंतरावर तुकूम येथे सन २०११-१२ या वर्षात सिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा गेल्या दोन वर्षांपासून फुटला आहे. बंधारा फुटल्यामुळे पाणी कठाणी नदीला जात आहे. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून या परिसरातील दीडशे एकर शेतजमिनीचा सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. अखेर शेतकºयांनी एकत्रित येऊन बंधाऱ्याचे थातुरमातूर काम केले. मात्र पावसाच्या प्रवाहाने काहीही फायदा झाला नाही.पाण्याने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतजमिनीत धान पिकाची लागवड करणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सिंचन विभागाच्या वतीने तुकूम येथे नव्याने बंधाºयाचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली नाही. त्यामुळे तुकूम गावातील शेतकºयांंनी नुकसानीच्या भितीपोटी यंदाच्या खरीप हंगामात आपल्या शेतजमिनीत धान पिकाची लागवड करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.पूर परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तलाव व बंधारे गेल्या दोन वर्षात फुटले. मात्र त्याची पक्की दुरूस्ती सिंचन विभागाच्या वतीने झाली नाही.जि.प. सिंचन विभागाची उदासीनता चव्हाट्यावरशासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून धानोरा नजीकच्या तुकूम येथे बंधाºयाचे काम मंजूर करण्यात आले आहे. सदर काम करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. सदर बंधाºयाचे काम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच केली होती. मात्र या विभागाने कामास प्रारंभ केला नाही, असा आरोपही तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी केला आहे.आता खरीप हंगामास प्रारंभ झाला असून धान पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. आता कोणतीही यंत्रणा सदर बंधाºयाचे काम करण्यासाठी शेतशिवार परिसरात आली तर काम करू देणार नाही, असा इशारा माणिक सिडाम, रवींद्र मेश्राम, देवजी तोफा, मंगल सिडाम, चंदू उसेंडी, लहू तोफा, श्यामराव तोफा, बाबुराव तोफा, आनंदराव आतला आदी शेतकºयांनी दिला आहे.