शहरं
Join us  
Trending Stories
1
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
2
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
3
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
4
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
5
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
6
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
7
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
8
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
9
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
10
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
11
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
12
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
13
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
14
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
15
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
16
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
17
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
18
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
20
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

यंदा दीडशे एकरवरील शेतजमीन राहणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:45 IST

सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परिणामी यंदा दीडशे एकरवर शेतजमीन पडिक राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देतुकूम शेतशिवारातील बंधारा पावसाच्या प्रवाहाने फुटला : धानपीक न घेण्याचा २५ ते ३० शेतकऱ्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परिणामी यंदा दीडशे एकरवर शेतजमीन पडिक राहण्याची शक्यता आहे.शासनाने शेतकºयांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने सिंचनाची सुविधा केली. धानोरापासून पाच किमी अंतरावर तुकूम येथे सन २०११-१२ या वर्षात सिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा गेल्या दोन वर्षांपासून फुटला आहे. बंधारा फुटल्यामुळे पाणी कठाणी नदीला जात आहे. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून या परिसरातील दीडशे एकर शेतजमिनीचा सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. अखेर शेतकºयांनी एकत्रित येऊन बंधाऱ्याचे थातुरमातूर काम केले. मात्र पावसाच्या प्रवाहाने काहीही फायदा झाला नाही.पाण्याने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतजमिनीत धान पिकाची लागवड करणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सिंचन विभागाच्या वतीने तुकूम येथे नव्याने बंधाºयाचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली नाही. त्यामुळे तुकूम गावातील शेतकºयांंनी नुकसानीच्या भितीपोटी यंदाच्या खरीप हंगामात आपल्या शेतजमिनीत धान पिकाची लागवड करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.पूर परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तलाव व बंधारे गेल्या दोन वर्षात फुटले. मात्र त्याची पक्की दुरूस्ती सिंचन विभागाच्या वतीने झाली नाही.जि.प. सिंचन विभागाची उदासीनता चव्हाट्यावरशासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून धानोरा नजीकच्या तुकूम येथे बंधाºयाचे काम मंजूर करण्यात आले आहे. सदर काम करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. सदर बंधाºयाचे काम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच केली होती. मात्र या विभागाने कामास प्रारंभ केला नाही, असा आरोपही तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी केला आहे.आता खरीप हंगामास प्रारंभ झाला असून धान पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. आता कोणतीही यंत्रणा सदर बंधाºयाचे काम करण्यासाठी शेतशिवार परिसरात आली तर काम करू देणार नाही, असा इशारा माणिक सिडाम, रवींद्र मेश्राम, देवजी तोफा, मंगल सिडाम, चंदू उसेंडी, लहू तोफा, श्यामराव तोफा, बाबुराव तोफा, आनंदराव आतला आदी शेतकºयांनी दिला आहे.