शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

येवलीत वाद चव्हाट्यावर

By admin | Updated: December 23, 2015 02:04 IST

खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी ...

गडचिरोली : खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी कामाचे कंत्राट घेतलेल्या ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केल्यामुळे येथे प्रचंड वाद उफाळला आहे. या संदर्भात येवलीच्या ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे. येवली आदर्श सांसद ग्राम कमिटीच्या अनेक बैठका पार पडल्या यात ग्राम विकासाच्या अनेक योजना आखण्यात आल्या असून विकासाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्राम पंचायतीशी समन्वय साधून ग्राम विकासाच्या योजना कार्यान्वित होत असताना येवली येथे सचिवालय परिसरात संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दरम्यान ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने याच जागेवर पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे. या निवासस्थानाच्या बांधकामास ग्रामस्थांनी विरोध दर्शवून या संदर्भाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी पचारे यांच्याकडे केली आहे. परिचर निवासस्थानाचे बांधकाम ग्राम सचिवालय परिसरात न करता इतर दुसऱ्या ठिकाणच्या जागेवर बांधकाम करण्याचे निर्देश बीडीओंनी दिले. त्यानंतर परिचर निवासस्थानाचे बांधकाम बंद करण्यात आले. प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही या कामाचे कंत्राट घेतलेल्या एका ग्राम पंचायत सदस्याने मनमानी करीत पुन्हा याच जागेवर परिचर निवासस्थानाचे खोदकाम सुरू केले. ग्राम पंचायतीच्या इतर सदस्यांचा या ठिकाणी होत असलेल्या परिचर निवासस्थानाच्या बांधकामास विरोध आहे. मात्र ग्रामस्थ, ग्रा. पं. चे इतर सदस्य यांची कोणतीही सूचना लक्षात न घेता, कंत्राटदार असलेल्या त्या ग्रा. पं. सदस्याने मनमर्जीने १३ डिसेंबरपासून परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे. या कंत्राटदार असलेल्या ग्रा. पं. सदस्याच्या बांधकामास येवली ग्राम पंचायतीच्या सरपंचाचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत नमुद केले आहे. जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ मोका चौकशी करून परिचर निवासस्थानाचे बांधकाम थांबवावे, जेणेकरून येथे ग्रामसचिवालयाची संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचे काम करता येईल. तसेच ग्राम पंचायत प्रशासन व ग्रामस्थांमधील वाद संपुष्ठात येईल, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.