शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

येवलीत वाद चव्हाट्यावर

By admin | Updated: December 23, 2015 02:04 IST

खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी ...

गडचिरोली : खा. अशोक नेते यांनी खासग्राम म्हणून दत्तक घेतलेल्या येवली गावात ग्रामसचिवालयालगत संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामाच्या ठिकाणी कामाचे कंत्राट घेतलेल्या ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केल्यामुळे येथे प्रचंड वाद उफाळला आहे. या संदर्भात येवलीच्या ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे. येवली आदर्श सांसद ग्राम कमिटीच्या अनेक बैठका पार पडल्या यात ग्राम विकासाच्या अनेक योजना आखण्यात आल्या असून विकासाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्राम पंचायतीशी समन्वय साधून ग्राम विकासाच्या योजना कार्यान्वित होत असताना येवली येथे सचिवालय परिसरात संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दरम्यान ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने याच जागेवर पशुवैद्यकीय परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे. या निवासस्थानाच्या बांधकामास ग्रामस्थांनी विरोध दर्शवून या संदर्भाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी पचारे यांच्याकडे केली आहे. परिचर निवासस्थानाचे बांधकाम ग्राम सचिवालय परिसरात न करता इतर दुसऱ्या ठिकाणच्या जागेवर बांधकाम करण्याचे निर्देश बीडीओंनी दिले. त्यानंतर परिचर निवासस्थानाचे बांधकाम बंद करण्यात आले. प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही या कामाचे कंत्राट घेतलेल्या एका ग्राम पंचायत सदस्याने मनमानी करीत पुन्हा याच जागेवर परिचर निवासस्थानाचे खोदकाम सुरू केले. ग्राम पंचायतीच्या इतर सदस्यांचा या ठिकाणी होत असलेल्या परिचर निवासस्थानाच्या बांधकामास विरोध आहे. मात्र ग्रामस्थ, ग्रा. पं. चे इतर सदस्य यांची कोणतीही सूचना लक्षात न घेता, कंत्राटदार असलेल्या त्या ग्रा. पं. सदस्याने मनमर्जीने १३ डिसेंबरपासून परिचर निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले आहे. या कंत्राटदार असलेल्या ग्रा. पं. सदस्याच्या बांधकामास येवली ग्राम पंचायतीच्या सरपंचाचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत नमुद केले आहे. जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ मोका चौकशी करून परिचर निवासस्थानाचे बांधकाम थांबवावे, जेणेकरून येथे ग्रामसचिवालयाची संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाचे काम करता येईल. तसेच ग्राम पंचायत प्रशासन व ग्रामस्थांमधील वाद संपुष्ठात येईल, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.