शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

आरमोरी क्षेत्रात निवडणूक महायुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 02:01 IST

आरमोरी तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्र व आठ पंचायत समिती गणात काँग्रेस, भाजपा, सेना, राकाँसह सर्वच राजकीय पक्षांनी

महेंद्रकुमार रामटेके   आरमोरी आरमोरी तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्र व आठ पंचायत समिती गणात काँग्रेस, भाजपा, सेना, राकाँसह सर्वच राजकीय पक्षांनी नवख्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराचा धुराळा गावागावात उडत असून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या विजयासाठी प्रचाराला जोमात सुरुवात केली आहे. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात केली आहे. आरमोरी तालुक्यात चार जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी २३ तर ८ पंचायत समिती गणासाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस, भाजपाने चारही जिल्हा परिषद क्षेत्रात आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जिल्हा परिषद क्षेत्रातून आपले उमेदवार उभे केले आहेत. बसपा आणि भाकपानेही प्रत्येकी एक जिल्हा परिषद क्षेत्रातून आपले उमेदवार उभे केले आहेत. निवडणूक प्रचार संपण्याला केवळ दोन ते तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आरमोरी तालुक्यात अजूनपर्यंत एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. स्थानिक नेत्यांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागत असल्याचे दिसून येत आहे. ठाणेगाव-इंजेवारी जिल्हा परिषद क्षेत्रातून सर्वाधिक ८ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून आशा शेंडे, भाजपाकडून मितलेश्वरी खोब्रागडे, शिवसेनेकडून मायादेवी गेडाम, राकाँकडून पूजा प्रकाश खोब्रागडे, बसपाकडून किरण धनपाल शेंडे तर अपक्ष म्हणून वेणुताई ज्ञानेश्वर ढवगाये, प्रीती किसनराव शंभरकर, रेखा सूरज वाळके हे उमेदवार उभे आहेत. अनुसूचित जाती महिला उमेदवारासाठी सदर क्षेत्र राखीव आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. दोन दिग्गज बंडखोर उमेदवारांचा प्रभावही प्रचारादरम्यान अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रात बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सिर्सी-वडधा जिल्हा परिषद क्षेत्रात आजपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी मात्र काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आल्याने त्याचा सामना पक्षाच्या उमेदवाराला करावा लागत आहे. या क्षेत्रातून काँग्रेसकडून वनीता सहाकाटे, भाजपाकडून गीता सुब्रमन कंगाले, अपक्ष म्हणून शीला भजनराव उसेंडी, छाया सुधाकर मडावी या उभ्या आहेत. आपला गड कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. वैरागड-मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रात सात उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून केशव तुळशिराम गेडाम, भाजपाकडून संपत यशवंत आडे, राकाँकडून जगदीश पेंदराम, शिवसेनेकडून नेताजी वासुदेव नारनवरे, भाजपकडून रोहिदास कुमरे तर अपक्ष म्हणून किशोर यादव गेडाम, मनेश्वर मारोती मडावी उभे आहेत. या क्षेत्रातही चुरसीची लढत होणार आहे. पळसगाव-अरसोडा क्षेत्रात शिवसेनेकडून लक्ष्मी हरीश मने, काँग्रेसकडून मनीषा मधुकर दोनाडकर, भाजपकडून सविता सेवकदास दर्वे, तर राकाँकडून वैशाली डोंगरवार उभ्या आहेत. यावेळीही या क्षेत्रात जुनीच लढत अनुभवायला मिळणार आहे. या क्षेत्रात आजपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. चारही जि. प. क्षेत्रांच्या निवडणुकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.