शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांची ताकद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:45 IST

काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा,....

ठळक मुद्देरामगोपाल भवानिया यांचे प्रतिपादन : काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन काँग्रेस जिल्हा निवडणूक अधिकारी रामगोपाल भवानीया यांनी केले.काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांना सुरुवात झाली आहे. याबाबतचा आढावा घेण्याबरोबरच निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजता निवडणूक बैठक घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला काँग्रेसचे गडचिरोली निरीक्षक सुरेश भोयर, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, रवींद्र दरेकर, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, माजी आ. पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे, जि. प. सदस्य वैशाली ताटपल्लीवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, पंकज गुड्डेवार, समशेर खॉ पठाण, नगरसेवक तथा काँग्रेस गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, प्रकाश देवतळे, प्रभाकर वासेकर, मधुकर चितडे, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, हरीश मोटवानी, ऐजाज शेख, पांडुरंग घोटेकर, मनोहर पोरेटी, काशिनाथ भडके, चंदू वडपल्लीवार आदी उपस्थित होते.पुढे बोलताना रामगोपाल भवानीया म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपा विरोधात नागरिकांच्या मनामध्ये लाट निर्माण झाली आहे. भाजपा सरकारने लोकशाहीची हत्या करण्याचे काम केले आहे. रोजगाराचे केवळ आश्वासन युवकांना देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बेकारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाही जीवंत ठेवली आहे. काँग्रेस पक्षाविषयी जनतेचा विश्वास अजूनही कमी झाला नाही. फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रामगोपाल भवानीया यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनीसुद्धा भाजपा सरकारवर टीकेचा आसूड ओढला. संचालन काँग्रेसचे जिल्हा सचिव एजाज शेख तर आभार शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनी मानले.