शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

काँग्रेसच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांची ताकद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:45 IST

काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा,....

ठळक मुद्देरामगोपाल भवानिया यांचे प्रतिपादन : काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन काँग्रेस जिल्हा निवडणूक अधिकारी रामगोपाल भवानीया यांनी केले.काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांना सुरुवात झाली आहे. याबाबतचा आढावा घेण्याबरोबरच निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजता निवडणूक बैठक घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला काँग्रेसचे गडचिरोली निरीक्षक सुरेश भोयर, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, रवींद्र दरेकर, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, माजी आ. पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे, जि. प. सदस्य वैशाली ताटपल्लीवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, पंकज गुड्डेवार, समशेर खॉ पठाण, नगरसेवक तथा काँग्रेस गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, प्रकाश देवतळे, प्रभाकर वासेकर, मधुकर चितडे, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, हरीश मोटवानी, ऐजाज शेख, पांडुरंग घोटेकर, मनोहर पोरेटी, काशिनाथ भडके, चंदू वडपल्लीवार आदी उपस्थित होते.पुढे बोलताना रामगोपाल भवानीया म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपा विरोधात नागरिकांच्या मनामध्ये लाट निर्माण झाली आहे. भाजपा सरकारने लोकशाहीची हत्या करण्याचे काम केले आहे. रोजगाराचे केवळ आश्वासन युवकांना देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बेकारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाही जीवंत ठेवली आहे. काँग्रेस पक्षाविषयी जनतेचा विश्वास अजूनही कमी झाला नाही. फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रामगोपाल भवानीया यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनीसुद्धा भाजपा सरकारवर टीकेचा आसूड ओढला. संचालन काँग्रेसचे जिल्हा सचिव एजाज शेख तर आभार शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनी मानले.