शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

येर्रावागूच्या पुलाचे काम रखडले

By admin | Updated: July 9, 2015 01:45 IST

मागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात थातुरमातूर दुरूस्ती करण्यात येणारा येर्रावागू पुलाचे काम पुन्हा रखडले आहे.

नागरिकांना फटका : जीवनावश्यक वस्तूंच्या भावावर झाला परिणामश्रीकांत सुगरवार आसरअल्लीमागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात थातुरमातूर दुरूस्ती करण्यात येणारा येर्रावागू पुलाचे काम पुन्हा रखडले आहे. त्यामुळे ५० ते ५५ गावांच्या दळणवळणावर परिणाम झाला असून पूल नसल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव या गावांमध्ये दुपटीने वाढले आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी पुलाअभावी लांबूनच्या भागातून यावे लागत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. याचा थेट आर्थिक फटका नागरिकाच्या खिशावर पडत आहे. राज्य परिवहन महामंडळाने आसरअल्लीकडे येणारी बससेवा येर्रावागू नाल्यावरचा पूल नादुरूस्त असल्याने बंद केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. एका प्रवाशाकडून दुप्पट ते तिप्पट रक्कम प्रवासी भाड्याच्या नावाखाली वसूल केली जात आहे. २० ते २२ प्रवासी एकाच वाहनात कोंबून भरले जात आहे. दररोज गरज असणारा भाजीपाला, डाळ, तांदूळ, तेल नागरिकांना विकत घेण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. शाळकरी लहान मुलांनाही नाल्यामध्ये पायी जाऊन पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पावसाळ्याच्या काळात पूर आल्यास पुरातून वाट काढणे विद्यार्थ्यांना कठिण होणार आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेती अवजारे व साहित्यही पूल नसल्यामुळे इतर मार्गाने आणावे लागते. त्यामुळे या साहित्याच्या किंमतीही वाढविण्यात आल्या आहेत. स्थानिक व्यावसायिक मालामाल असले तरी नागरिकांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाची गतवर्षी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पाहणी केली होती. आता पूल दुरूस्तीच्या कामासाठी त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.सीमावर्ती भागातील गावांना फटकातेलंगणा राज्याच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली परिसरात येणाऱ्या ५० ते ५५ गावांना येर्रावागू नाल्यावरचा पूल वाहून गेल्याने थेट फटका बसतो. राज्य परिवहन महामंडळ आपली बससेवा तत्काळ बंद करून देते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने नागरिकांची मनमानी लूट करतात. प्रवासासाठीही अतिरिक्त पैसे प्रवाशांना मोजावे लागतात. यामुळे महामंडळाचे नुकसानही होते.