शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

काम सुरू झाल्याशिवाय हटणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:00 IST

राष्टÑीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याशिवाय महामार्गावरचे अतिक्रमण हटविले जाणार नाही, असा इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.

ठळक मुद्देआमदारांसोबत चर्चा : स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : राष्टÑीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याशिवाय महामार्गावरचे अतिक्रमण हटविले जाणार नाही, असा इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.केंद्र शासनाने वडसा-गडचिरोली-आष्टी-सिरोंचा हा राष्टÑीय महामार्ग मंजूर केला आहे. या महामार्गाच्या कामाला अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. तरीही अतिक्रमणधारकांना बांधकाम विभागाच्या वतीने नोटीस पाठविली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी अतिक्रमीत छोट्या दुकानदारांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान जोपर्यंत महामार्गाचे काम सुरू होणार नाही, तोपर्यंत दुकानदार अतिक्रमण हटविणार नाही, असा इशारा दिला.आष्टी येथे काही दुकानदारांनी पक्के अतिक्रमण केले आहे. लहान दुकानदारांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात असेल तर मोठ्याही दुकानदारांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी लहान दुकानदारांनी केली आहे. अतिक्रमण हटविल्यास शेकडो युवक बेरोजगार होणार आहेत. या युवकांना व्यवसाय थाटण्यासाठी नदी किनाºयालगत पेपर मिलच्या जागेवर असलेल्या स्मशान शेड देण्याची मागणी केली. आ. डॉ. देवराव होळी यांनी स्मशान शेडच्या जागेची पाहणी करून यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. स्मशान शेडची जागा व्यावसायिकांना दिल्यास अंत्यसंस्कारासाठी अडचण होणार नाही, याचीही दखल घेतली जाईल.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यावसायिकांना गाळे बांधून दिले जातील, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी दिले. यावेळी संजय पांडे, दिलीप शेख, माजी ग्रा.पं. सदस्य वृंदा नामेवार, शकुर, मनोहर लहांगे, बावणे, रवी नामेवार, विनोद चांदेकर उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यातील तालुकास्तरावरील शहरांमधून राष्टÑीय महामार्ग जात आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाटलेल्यांची इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे. त्यामुळे मार्गाच्या बाजूला अतिक्रमण करून इमारत बांधलेल्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.