शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या कामाने सांडपाणी घरांत

By admin | Updated: February 9, 2016 01:14 IST

येथील चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील रूळालगतचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

देसाईगंजातील चुनाभट्टी मार्ग : नागरिकांवर इतरत्र राहण्याची आली वेळ देसाईगंज : येथील चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील रूळालगतचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने लगतच्या घरांमध्ये सांडपाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांवर स्वत:चे घर सोडून शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. रेल्वेच्या या कामामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे रूळाखालून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू केल्याने सांडपाणी जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरले. यापूर्वी नगर पालिका प्रशासनाकडे सदर समस्येची तक्रार करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनासह रेल्वे प्रशासनानेही या समस्येची दखल न घेतल्याने सदर स्थिती उद्भवली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या विविध कामांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्नमवार नगर, जवाहर वॉर्डातील सांडपाणी रूळाखालून वाहत जाऊन रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेल्या डबक्यात जात असते. घरांत पाणी शिरल्यामुळे या परिसरातील नागरिकांना शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. विकास कामे करीत असताना कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दखल विभागाने घ्यावी, अशा सूचना शासनास्तरावर असतानाही स्थानिक नगर पालिका व रेल्वे प्रशासन शासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी येथील नागरिकांमध्ये दोन्ही प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)बांधकामासाठी अडविले पाणीरेल्वेस्थानक विस्ताराचे काम जोमाने सुरू करण्यात आल्याने विस्ताराच्या कामात बांधकाम करण्यासाठी सांडपाणी पूर्णपणे अडविण्यात आले. मात्र साचलेले पाणी रेल्वे रूळालगतच्या नागरिकांच्या घरात शिरले. या भागातील नागरिकांनी वेळीच नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारालाही यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र रेल्वे व नगर पालिका प्रशासनानेही नागरिकांच्या तक्रारीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी नागरिकांच्या घरांत सांडपाणी शिरले. बांधकामासाठी पाणी अडविताना परिसरातील नागरिकांचा विचार करणे गरजेचे होते. मात्र नागरिकांचा विचार करण्यात आला नाही.