शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

रेल्वेच्या कामाने सांडपाणी घरांत

By admin | Updated: February 9, 2016 01:14 IST

येथील चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील रूळालगतचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

देसाईगंजातील चुनाभट्टी मार्ग : नागरिकांवर इतरत्र राहण्याची आली वेळ देसाईगंज : येथील चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील रूळालगतचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने लगतच्या घरांमध्ये सांडपाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांवर स्वत:चे घर सोडून शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. रेल्वेच्या या कामामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे रूळाखालून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू केल्याने सांडपाणी जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरले. यापूर्वी नगर पालिका प्रशासनाकडे सदर समस्येची तक्रार करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनासह रेल्वे प्रशासनानेही या समस्येची दखल न घेतल्याने सदर स्थिती उद्भवली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या विविध कामांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्नमवार नगर, जवाहर वॉर्डातील सांडपाणी रूळाखालून वाहत जाऊन रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेल्या डबक्यात जात असते. घरांत पाणी शिरल्यामुळे या परिसरातील नागरिकांना शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. विकास कामे करीत असताना कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दखल विभागाने घ्यावी, अशा सूचना शासनास्तरावर असतानाही स्थानिक नगर पालिका व रेल्वे प्रशासन शासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी येथील नागरिकांमध्ये दोन्ही प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)बांधकामासाठी अडविले पाणीरेल्वेस्थानक विस्ताराचे काम जोमाने सुरू करण्यात आल्याने विस्ताराच्या कामात बांधकाम करण्यासाठी सांडपाणी पूर्णपणे अडविण्यात आले. मात्र साचलेले पाणी रेल्वे रूळालगतच्या नागरिकांच्या घरात शिरले. या भागातील नागरिकांनी वेळीच नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारालाही यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र रेल्वे व नगर पालिका प्रशासनानेही नागरिकांच्या तक्रारीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी नागरिकांच्या घरांत सांडपाणी शिरले. बांधकामासाठी पाणी अडविताना परिसरातील नागरिकांचा विचार करणे गरजेचे होते. मात्र नागरिकांचा विचार करण्यात आला नाही.