शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या कामाने सांडपाणी घरांत

By admin | Updated: February 9, 2016 01:14 IST

येथील चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील रूळालगतचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

देसाईगंजातील चुनाभट्टी मार्ग : नागरिकांवर इतरत्र राहण्याची आली वेळ देसाईगंज : येथील चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील रूळालगतचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने लगतच्या घरांमध्ये सांडपाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांवर स्वत:चे घर सोडून शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. रेल्वेच्या या कामामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे रूळाखालून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू केल्याने सांडपाणी जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरले. यापूर्वी नगर पालिका प्रशासनाकडे सदर समस्येची तक्रार करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनासह रेल्वे प्रशासनानेही या समस्येची दखल न घेतल्याने सदर स्थिती उद्भवली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या विविध कामांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्नमवार नगर, जवाहर वॉर्डातील सांडपाणी रूळाखालून वाहत जाऊन रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेल्या डबक्यात जात असते. घरांत पाणी शिरल्यामुळे या परिसरातील नागरिकांना शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. विकास कामे करीत असताना कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दखल विभागाने घ्यावी, अशा सूचना शासनास्तरावर असतानाही स्थानिक नगर पालिका व रेल्वे प्रशासन शासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी येथील नागरिकांमध्ये दोन्ही प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)बांधकामासाठी अडविले पाणीरेल्वेस्थानक विस्ताराचे काम जोमाने सुरू करण्यात आल्याने विस्ताराच्या कामात बांधकाम करण्यासाठी सांडपाणी पूर्णपणे अडविण्यात आले. मात्र साचलेले पाणी रेल्वे रूळालगतच्या नागरिकांच्या घरात शिरले. या भागातील नागरिकांनी वेळीच नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारालाही यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र रेल्वे व नगर पालिका प्रशासनानेही नागरिकांच्या तक्रारीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी नागरिकांच्या घरांत सांडपाणी शिरले. बांधकामासाठी पाणी अडविताना परिसरातील नागरिकांचा विचार करणे गरजेचे होते. मात्र नागरिकांचा विचार करण्यात आला नाही.