शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

जंगल कामगार संस्थांना कामे द्या

By admin | Updated: December 12, 2015 04:04 IST

७८ टक्के वन असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे अर्थकारण जंगलावर आधारित आहे. जंगलातून मोठ्या प्रमाणावर

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : वन महामंडळाकडे कामे वळते केल्याने अडचणगडचिरोली : ७८ टक्के वन असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे अर्थकारण जंगलावर आधारित आहे. जंगलातून मोठ्या प्रमाणावर वनोपजाच्या माध्यमातून उत्पन्न नागरिकांना मिळत असते. या सोबतच जिल्ह्यातील जंगल कामगार संस्थांच्या माध्यमातून कामगारांना काम उपलब्ध होत होते. परंतु राज्य शासनाने जंगल कामगार सहकारी संस्थांना कामे देण्याच्या प्रक्रियेत वगळून वन विकास महामंडळाकडे ही कामे वळती केली आहे. त्यामुळे जंगल कामगार संस्थांना मिळणारी कुपकटाईची कामे बंद झाली आहे. या कामावर मोठ्या प्रमाणावर स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत होता. परंतु आता त्यांच्या रोजगारावरही गदा कोसळली आहे. या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी जंगल कामगार सहकारी संस्थांच्या मजूर व संस्था प्रतिनिधींनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट माजी आ. हरिराम वरखडे यांच्या नेतृत्वात घेतली व जंगल कामगार सहकारी संस्थांना गडचिरोली जिल्ह्यात कामे उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली.यापूर्वीही जंगल कामगार सहकारी संस्थांच्या संघाचे अध्यक्ष असलेले माजी खा. मारोतराव कोवासे यांनी राज्य शासनाकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. जंगल कामगार सहकारी संस्थांकडून कूपकटाईचे कामे काढून घेतल्यामुळे जंगल कामगार सहकारी संस्थांच्या आर्थिक स्थितीवरही याचा विपरीत परिणाम होत असून जंगल कामगार सहकारी संस्था उद्ध्वस्त होण्याची भीती माजी खा. कोवासे यांनी वर्तविली आहे.राज्य शासनाने यासंदर्भात तत्काळ पाऊले उचलावे व जंगल कामगार सहकारी संस्थांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कोवासे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन पाठवून केली आहे. (नगर प्रतिनिधी)