शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

विद्युत उपकेंद्राचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:58 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली.

ठळक मुद्देअडपल्ली चेक येथील काम : परिसराच्या ४० गावांत अनेकदा निर्माण होते वीज समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली. १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही काम पूर्ण न झाल्याने परिसरातील वीज समस्या केव्हा सुटेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.दीनदयाल उपाध्याय योजनेतून अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून काम सुरू झाले. त्यानंतर ३१ मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचा करार झाला. वीज उपकेंद्र निर्मितीचे काम हैदराबाद येथील एका कंपनीला देण्यात आला होता. मात्र जवळपास १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. सध्या केवळ ५० टक्केच काम झाल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येते. विशेष म्हणजे ३३ के व्ही उपकेंद्र निर्मितीचे काम संथगतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. चामोर्शी तालुक्यातील अडपल्ली माल, अडपल्ली चेक, सुभाषग्राम व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावात वीज समस्या निर्माण होते.विशेषत: पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात विजेचा लपंडाव वाढतो. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तो सुरळीत होत नाही. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांना पंखे, कुलर व एसी लावावी लागते. परंतु याचवेळी वीज पुरवठा वारंवार खंडित होतो, तर कधी वीज पुरवठा गायब असतो. अशावेळी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा जंगलातून करण्यात आला आहे. पावसाळ्यात वादळ, वारा सुटल्यानंतर झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडत असल्याने पुरवठा खंडित होतो. जवळपास चार ते पाच दिवस तो सुरळीत होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण केले जात आहे. परंतु सदर उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने या भागातील वीज समस्या सुटण्यास नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.