शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

विद्युत उपकेंद्राचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:58 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली.

ठळक मुद्देअडपल्ली चेक येथील काम : परिसराच्या ४० गावांत अनेकदा निर्माण होते वीज समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली. १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही काम पूर्ण न झाल्याने परिसरातील वीज समस्या केव्हा सुटेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.दीनदयाल उपाध्याय योजनेतून अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून काम सुरू झाले. त्यानंतर ३१ मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचा करार झाला. वीज उपकेंद्र निर्मितीचे काम हैदराबाद येथील एका कंपनीला देण्यात आला होता. मात्र जवळपास १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. सध्या केवळ ५० टक्केच काम झाल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येते. विशेष म्हणजे ३३ के व्ही उपकेंद्र निर्मितीचे काम संथगतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. चामोर्शी तालुक्यातील अडपल्ली माल, अडपल्ली चेक, सुभाषग्राम व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावात वीज समस्या निर्माण होते.विशेषत: पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात विजेचा लपंडाव वाढतो. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तो सुरळीत होत नाही. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांना पंखे, कुलर व एसी लावावी लागते. परंतु याचवेळी वीज पुरवठा वारंवार खंडित होतो, तर कधी वीज पुरवठा गायब असतो. अशावेळी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा जंगलातून करण्यात आला आहे. पावसाळ्यात वादळ, वारा सुटल्यानंतर झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडत असल्याने पुरवठा खंडित होतो. जवळपास चार ते पाच दिवस तो सुरळीत होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण केले जात आहे. परंतु सदर उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने या भागातील वीज समस्या सुटण्यास नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.