शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पुलाच्या अ‍ॅप्रोच मार्गाचे काम रखडले

By admin | Updated: June 12, 2017 00:58 IST

जोगीसाखरा ते वैरागड मार्गावरील नाल्यावर मागील वर्षी जुने पूल तोडून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले.

जोगीसाखरा-वैरागड दरम्यानचा पूल : पावसात रहदारी ठप्प पडण्याचा धोकालोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : जोगीसाखरा ते वैरागड मार्गावरील नाल्यावर मागील वर्षी जुने पूल तोडून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र दोन्ही बाजुच्या अ‍ॅप्रोच रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या मार्गाचे खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने २०१५-१६ मध्ये वैरागड, जोगीसाखरा मार्गावरील नाल्यावरील जुने पूल तोडले. त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यास सुरूवात केली. या बाबीला दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. मात्र अजूनपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. पूल उंच असल्याने अ‍ॅप्रोच रस्ते नव्याने तयार करण्यात आले आहेत. दोन्ही अ‍ॅप्रोच रस्त्यावर माती व गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र दोन्ही बाजुला मार्गाचे खडीकरण झाले नाही. बाजुला पिचिंग करण्याचे काम अपूर्ण आहे. रहदारीपुरता माती टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यात मातीचे चिखल निर्माण होऊन जड वाहने या ठिकाणी फसण्याचा धोका निर्माण झाला आहे. सातत्याने वाहने ये-जा करीत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी मार्गाचे खडीकरण न झाल्यास रहदारी ठप्प पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्ग धानोरा-मालेवाडा-वैरागड-जोगीसाखरा-शंकरपूर मार्गे गोंदियाकडे जातो. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. रहदारी बंद पडल्यास दर दिवशी ये-जा करणाऱ्यांची फार मोठी पंचाईत होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्याचे खडीकरण करण्याचे निर्देश कंत्राटदाराला द्यावे, अशी मागणी जोगीसाखरा परिसरातील नागरिकांनी केली आहे.