शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महिला वन कर्मचारी न्यायापासून वंचित

By admin | Updated: May 12, 2017 02:36 IST

आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांच्या विरोधात अहेरी व आलापल्ली वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला

दोन वर्ष उलटले : उपविभागीय वनाधिकाऱ्यांवर कारवाई नाही लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांच्या विरोधात अहेरी व आलापल्ली वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. विशाखा समितीच्या अहवालात अग्रवाल हे दोषी असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र अद्यापही अग्रवाल यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे वन विभागातील पीडित महिला कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. रवी अग्रवाल हे अहेरी व आलापल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत असताना त्यांचेकडून महिला वनकर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, अधिकारी पदाचा धाक दाखवून महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे, असे गंभीर आरोप करीत महिला कर्मचाऱ्यांनी तत्कालीन उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांच्याकडे ९ जून २०१५ रोजी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीयस्तरावर सुनीता तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समिती गठित केली. विशाखा समितीने अग्रवाल यांच्या कारभाराची चौकशी केली. संबंधित वनकर्मचाऱ्यांचे बयान नोंदवून घेण्यात आले. अग्रवाल यांना दोषी ठरवत तसा अहवाल विशाखा समितीने उपवनसंरक्षक मीना यांच्याकडे दिला होता. मात्र अद्यापही अग्रवाल यांच्यावर कारवाई झाली नाही. अग्रवाल यांच्या विरोधात जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. वन विभागाकडून वनाधिकारी रवी अग्रवाल यांना अभय मिळत असल्याने त्यांची पुन्हा हिंमत वाढत आहे. अग्रवाल हे महिला व पुरूष वनकर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे कंकडालवार व खरवडे यांनी निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.