शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

ठाण्यावर महिला धडकल्या

By admin | Updated: February 27, 2015 01:19 IST

स्थानिक विर्शी वार्डात दिवसागणिक दारू व सट्ट्याचे अवैद्य अड्डे वाढत आहेत. याची पोलीस विभागाला माहिती असूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ...

देसाईगंज : स्थानिक विर्शी वार्डात दिवसागणिक दारू व सट्ट्याचे अवैद्य अड्डे वाढत आहेत. याची पोलीस विभागाला माहिती असूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने बुधवारी रात्री ९ वाजता दोन हजार महिला, पुरूषांचा मोर्चा देसाईगंज पोलीस ठाण्यावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्त्व नगराध्यक्ष श्याम उईके, विर्शी वाडार्तील नगरसेवक मनोज खोब्रागडे, आबेद अली यांनी केले. वार्डातील दारूबंदीबाबत पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा केल्या नंतर सकारात्मक आश्वासन मिळाल्यावर महिला व नागरिक माघारी फिरले.सध्या ब्रम्हपुरी मुख्यमार्गावरील कब्रस्तान, बायपास चौक दारूविक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे. शहरातील हा भाग नवीन वाईन स्टेशनच्या रूपात समोर येत आहे. ब्रम्हपुरी मार्गावरील रहदारीमुळे या वाईन हबवर नेहमीच गर्दी पाहायला मिळत आहे. दारूविक्री सोबत या ठिकाणी सट्टापट्टीही घेतली जाते. यामुळे विर्शी वार्डात अशांतता पसरत चालली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विर्शी वासीयांनी चौकातील व वाडार्तील दारू व सट्टा तत्काळ बंद झाला पाहिजे यासाठी थेट पोलीस स्टेशनवरच मोर्चा काढला. या मोर्चात गावातील शेकडो महिला, तरूणांनी सहभाग घेतला. पोलिसांना दारूविक्रीची कल्पना असून देखील पोलीस प्रशासन कोणत्याच प्रकारची कारवाई करित नसल्याचे महिलांनी यावेळी बोलून दाखविले. पोलीस निरीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत गावकऱ्यांनी दारूविक्रीबाबत पोलीस प्रशासनाला सूचना कराव्यात, कुठे दारूविक्री होत आहे त्याबाबत माहिती दिल्यास सबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांमध्ये दारूबंदीबाबतच्या जागृतीमुळे आता तरी पोलीस प्रशासन दारूबंदी करण्यासाठी समोर येईल काय, असा प्रश्न महिलांनी यावेळी उपस्थित केला. मागील वर्षी स्थानिक जुनी वडसा वाडार्तील नागरिकांनी देखील वार्डात दारूबंदी केली. तरीही वार्डात अजूनही छुप्यामागाने दारूविक्री सुरूच आहे. पोलीस प्रशासनाच्या नाममात्र कारवाईमुळे शहरातील दारूविक्रीला उधाण आले आहे. दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूबंदीकरिता नागरिकांना लढा द्यावा लागत आहे. जिल्ह्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)देसाईगंजच्या ग्रामीण भागातही दारूविक्री जोरातदेसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीत विविध वार्डांमध्ये दारूविक्री जोरात सुरू असली तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरेगाव येथे काही दिवसांपूर्वी गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरम अभावी ती तहकूब झाली. आता २८ तारखेला सभा घेऊन दारूबंदीच्या निर्णयावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन मात्र दारूबंदी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.