शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

आगरोधक प्रणालीच्या सुविधेत महिला रुग्णालयाची इमारत नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:08 IST

तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही.

ठळक मुद्देसमस्या संपता संपेना : अग्निशमन यंत्र लावून काम भागविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे फायर आॅडिटमध्ये या इमारतीला नापास करण्यात आले आहे.नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे फायर आॅडिट केले. त्यात अग्निशमनच्या पुरेशा सुविधा नसल्याचा ठपका ठेवला आहे. विशेष म्हणजे इमारतीची भव्यता पाहता प्रत्येक मजल्यावर आग विझविण्यासाठी पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन असणारी होजरील सिस्टीम असणे गरजेचे आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही यंत्रणा असल्याशिवाय अग्निशमन विभागाकडून या इमारतीला योग्यतेचे प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे.विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या इमारतीत मोजकेच अग्निशमन यंत्र (फायर इस्टिंग्विशर) लावलेले होते. त्यापैकी ७ यंत्रांची मुदतही संपलेली होती. ही बाब न.प.च्या अग्निशमन विभागाने निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने प्रत्येक मजल्यावर पुरेसे अग्निशमन यंत्र लावले आहेत. मात्र पाण्याच्या पाईपलाईनचे काम छोटे अग्निशमन यंत्र करू शकेल का, हे सांगणे कठीण झाले आहे.इमारतीच्या नकाशात दडले काय?वास्तविक सार्वजनिक वापराच्या अशा मोठ्या इमारतीत आग लागल्यास जीवित हाणी टाळण्यासाठी पाणी पुरवठा करणारी आगरोधक यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे असताना या भव्य इमारतीची उभारणी करण्यापूर्वी नकाशात ती यंत्रणा होती की नाही? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. जर नकाशात नसेल तर ही चूक तत्कालीन अधिकाºयांच्या लक्षात आली नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.अधिकृत एजन्सीकडून फायर आॅडिट का नाही?दिवसरात्र रुग्णांचे वास्तव्य राहणाºया रुग्णालयाच्या इमारतीचे फायर आॅडिट अधिकृत एजन्सीकडूनच करणे गरजेचे आहे. असे असताना अग्निशमन अधिकारीच नसलेल्या नगर परिषदेच्या यंत्रणेकडून झालेले फायर आॅडिट कितपत योग्य? असा प्रश्न शंका निर्माण करीत आहे. गडचिरोलीत अधिकृत एजन्सी नसली तरी नागपुरातील एजन्सीकडे हे काम देऊन भविष्यातील दुर्घटनेचा धोका टाळता येऊ शकतो.