शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आगरोधक प्रणालीच्या सुविधेत महिला रुग्णालयाची इमारत नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:08 IST

तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही.

ठळक मुद्देसमस्या संपता संपेना : अग्निशमन यंत्र लावून काम भागविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे फायर आॅडिटमध्ये या इमारतीला नापास करण्यात आले आहे.नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे फायर आॅडिट केले. त्यात अग्निशमनच्या पुरेशा सुविधा नसल्याचा ठपका ठेवला आहे. विशेष म्हणजे इमारतीची भव्यता पाहता प्रत्येक मजल्यावर आग विझविण्यासाठी पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन असणारी होजरील सिस्टीम असणे गरजेचे आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही यंत्रणा असल्याशिवाय अग्निशमन विभागाकडून या इमारतीला योग्यतेचे प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे.विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या इमारतीत मोजकेच अग्निशमन यंत्र (फायर इस्टिंग्विशर) लावलेले होते. त्यापैकी ७ यंत्रांची मुदतही संपलेली होती. ही बाब न.प.च्या अग्निशमन विभागाने निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने प्रत्येक मजल्यावर पुरेसे अग्निशमन यंत्र लावले आहेत. मात्र पाण्याच्या पाईपलाईनचे काम छोटे अग्निशमन यंत्र करू शकेल का, हे सांगणे कठीण झाले आहे.इमारतीच्या नकाशात दडले काय?वास्तविक सार्वजनिक वापराच्या अशा मोठ्या इमारतीत आग लागल्यास जीवित हाणी टाळण्यासाठी पाणी पुरवठा करणारी आगरोधक यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे असताना या भव्य इमारतीची उभारणी करण्यापूर्वी नकाशात ती यंत्रणा होती की नाही? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. जर नकाशात नसेल तर ही चूक तत्कालीन अधिकाºयांच्या लक्षात आली नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.अधिकृत एजन्सीकडून फायर आॅडिट का नाही?दिवसरात्र रुग्णांचे वास्तव्य राहणाºया रुग्णालयाच्या इमारतीचे फायर आॅडिट अधिकृत एजन्सीकडूनच करणे गरजेचे आहे. असे असताना अग्निशमन अधिकारीच नसलेल्या नगर परिषदेच्या यंत्रणेकडून झालेले फायर आॅडिट कितपत योग्य? असा प्रश्न शंका निर्माण करीत आहे. गडचिरोलीत अधिकृत एजन्सी नसली तरी नागपुरातील एजन्सीकडे हे काम देऊन भविष्यातील दुर्घटनेचा धोका टाळता येऊ शकतो.