शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आगरोधक प्रणालीच्या सुविधेत महिला रुग्णालयाची इमारत नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:08 IST

तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही.

ठळक मुद्देसमस्या संपता संपेना : अग्निशमन यंत्र लावून काम भागविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे फायर आॅडिटमध्ये या इमारतीला नापास करण्यात आले आहे.नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे फायर आॅडिट केले. त्यात अग्निशमनच्या पुरेशा सुविधा नसल्याचा ठपका ठेवला आहे. विशेष म्हणजे इमारतीची भव्यता पाहता प्रत्येक मजल्यावर आग विझविण्यासाठी पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन असणारी होजरील सिस्टीम असणे गरजेचे आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही यंत्रणा असल्याशिवाय अग्निशमन विभागाकडून या इमारतीला योग्यतेचे प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे.विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या इमारतीत मोजकेच अग्निशमन यंत्र (फायर इस्टिंग्विशर) लावलेले होते. त्यापैकी ७ यंत्रांची मुदतही संपलेली होती. ही बाब न.प.च्या अग्निशमन विभागाने निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने प्रत्येक मजल्यावर पुरेसे अग्निशमन यंत्र लावले आहेत. मात्र पाण्याच्या पाईपलाईनचे काम छोटे अग्निशमन यंत्र करू शकेल का, हे सांगणे कठीण झाले आहे.इमारतीच्या नकाशात दडले काय?वास्तविक सार्वजनिक वापराच्या अशा मोठ्या इमारतीत आग लागल्यास जीवित हाणी टाळण्यासाठी पाणी पुरवठा करणारी आगरोधक यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे असताना या भव्य इमारतीची उभारणी करण्यापूर्वी नकाशात ती यंत्रणा होती की नाही? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. जर नकाशात नसेल तर ही चूक तत्कालीन अधिकाºयांच्या लक्षात आली नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.अधिकृत एजन्सीकडून फायर आॅडिट का नाही?दिवसरात्र रुग्णांचे वास्तव्य राहणाºया रुग्णालयाच्या इमारतीचे फायर आॅडिट अधिकृत एजन्सीकडूनच करणे गरजेचे आहे. असे असताना अग्निशमन अधिकारीच नसलेल्या नगर परिषदेच्या यंत्रणेकडून झालेले फायर आॅडिट कितपत योग्य? असा प्रश्न शंका निर्माण करीत आहे. गडचिरोलीत अधिकृत एजन्सी नसली तरी नागपुरातील एजन्सीकडे हे काम देऊन भविष्यातील दुर्घटनेचा धोका टाळता येऊ शकतो.