शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

नागरिकांचा विश्वास कायमसाठी जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:45 IST

गेल्या ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली जिल्हा नक्षलवादाची झळ सहन करीत आहे. कायम दहशतीत वावरणाºया या जिल्ह्यात यावर्षी मात्र नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहातील....

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली जिल्हा नक्षलवादाची झळ सहन करीत आहे. कायम दहशतीत वावरणाºया या जिल्ह्यात यावर्षी मात्र नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहातील सात दिवसात कोणतीही हिंसक किंवा अप्रिय घटना घडली नाही. पोलिसांनी नागरिकांच्या जागृतीसाठी जे-जे काही उपक्रम राबविले त्यात नागरिकांनी चांगले सहकार्य केले. पोलीस नागरिकांचा विश्वास जिंकण्यात बºयाच अंशी यशस्वी झाले असाच त्याचा अर्थ काढता येईल. खरे तर त्यासाठी सर्व तरुण पोलीस अधिकारी आणि प्रत्यक्ष बंदूक हाती घेऊन जंगलात गस्त घालणारे तमाम पोलीस कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.केवळ नक्षल कारवायांना प्रतिबंध घातला म्हणजे पोलीस ही लढाई जिंकले असे होत नाही. मुळात ज्यांच्यासाठी ही लढाई सुरू आहे त्या आदिवासी नागरिकांचा विश्वास जिंकण्यात पोलिसांची खरी जीत आहे. जे आदिवासी लोक आजवर नक्षलवाद्यांनाच नाही तर पोलिसांनाही घाबरत होते त्यांना आज पोलीस जवळचे वाटू लागले आहेत. केवळ दंडूकेशाहीचा धाक दाखवून सर्वकाही साध्य होत नाही. आजपर्यंत पोलीस हेच करत आले आणि म्हणूनच नागरिक-पोलीस संबंध फारसे चांगले नव्हते. परिणामी नक्षल चळवळ अधिक फोफावली. मात्र उशिरा का होईना, याचा अभ्यास पोलिसांनी केला. जुन्या चुका सुधारून वेगळ्या पद्धतीने नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आणि म्हणूनच नक्षल कारवाया रोखण्यात त्यांना यश मिळत आहे.गावात एखाद्याच्या घरी नक्षलवादी आले किंवा त्यांना ग्रामस्थाने जेवण दिले म्हणजे ती व्यक्ती नक्षल समर्थक होत नाही. जीवाच्या भितीने ती व्यक्ती इच्छा नसूनही काही गोष्टी करीत असते. पण त्या व्यक्तीच्या मनस्थितीचा काहीही विचार न करता पोलीस अपराध्याच्या नजरेतून त्या ग्रामस्थाकडे पाहतात. एकीकडे पोलीस खबºया असल्याच्या संशयातून नक्षल्यांचा रोष सहन करायचा, तर दुसरीकडे नक्षल समर्थक असल्याच्या संशयातून पोलिसांचे दंडुके खायचे, हेच वर्षानुवर्षे होत आले. त्या निरपराध आणि असहाय आदिवासी व्यक्तीच्या त्याच्या जागी स्वत:ला ठेवून त्याच्यावर काय प्रसंग बितत असेल याचा विचार निदान पोलिसांनी तरी करायलाच हवा. अलिकडे हे चित्र हळूहळू बदलत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक बदल होत आहे. पोलिसांनी केवळ नक्षल सप्ताहापुरती नागरिकांशी जवळीकता न ठेवता कायमसाठी त्यांच्याबद्दल ‘मित्रत्वा’ची भावना ठेवावी लागणार आहे.आज नागरिकांना विविध पातळींवर मदत करण्यासोबतच रस्ता दुरूस्तीसारखी इतर विभागांची कामेही पोलीस करताना दिसत आहेत. नक्षल्यांशी लढताना गोळीचे उत्तर गोळीने द्यावे लागत असले तरी नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी पोलिसांनी मदतीचा हात कायम पुढे ठेवल्यास आदिवासी नागरिकही त्यांचा हात पोलिसांच्या हाती दिल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांचा हा विश्वास पोलिसांनी कायमसाठी टिकविणे आणि पोलीस-नागरिक संबंध अधिक दृढ करणे हाच नक्षलवाद नियंत्रणाचा सोपा मार्ग ठरणार आहे.