शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

स्थानांतर रोखणार - लोकप्रतिनिधी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:53 IST

तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.सदर हत्तींचे १५ फेब्रुवारीपर्यंत स्थानांतरण करण्याचा आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी काढला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच कमलापूर परिसरासह जिल्हावासियांमध्ये तीव्र भावना उमटल्या. त्यामुळे पालकमंत्र्यांसह खासदारांनीही याला विरोध दर्शविल्याने हत्ती कॅम्पचे स्थानांतर रोखण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.१९६२ साली कमलापुरात केवळ एक हत्ती होता. काही वर्षानंतर आलापल्ली येथून दुसरा हत्ती आणण्यात आला. नंतर त्यांची पिलावळ झाली. आता तीन नर आणि चार मादी असे सात हत्ती येथे आहेत. वाघांचा माग घेण्याचे प्रशिक्षण या हत्तींना पेंच प्रकल्पात दिले जाणार असल्याचे निमित्त सांगण्यात आले आहे. मात्र कमलापुरातही हे हत्ती रिकामे नाहीत. जंगलातून मोठमोठी सागाची लाकडे वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर कित्येक वर्षांपासून केला जातो. याशिवाय पर्यटकांच्या दृष्टीने हे हत्ती आकर्षणाचे केंद्र आहे.एका ठिकाणी सात हत्ती पहायला मिळणे पर्यटकांसाठी दुर्मिळ असते. पण कमलापुरात ती सोय आहे. हे हत्ती येथून हलविल्यास गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या वनपर्यटकांचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. औद्योगिक विकासाअभावी रोजगाराची दुसरी साधनं जिल्ह्यात नाहीत. किमान पर्यटकांचा ओढा वाढल्यास त्यातून काही प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्यामुळेच नागरिकांचाही हत्तींच्या स्थानांतरणास विरोध आहे. स्थानांतराबाबत वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.पालकमंत्री व खासदारांनी गांभीर्याने घेतला विषयवनराज्यमंत्री असलेल्या पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी हत्तींच्या स्थानांतराचा हा विषय गांभिर्याने घेतला आहे. विशेष म्हणजे कमलापूर हे त्यांच्या गृहमतदार संघातील गाव आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर ना.आत्राम यांनी हत्ती कॅम्पचे स्थानांतर होऊ दिले जाणार नाही, असा निश्चिय लोकमतकडे व्यक्त केला.जिल्ह्याचे खासदार अशोक नेते यांनीही यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. हत्ती कॅम्प हा गडचिरोली जिल्ह्याचे वैभव आहे. हे वैभव दुसरीकडे नेल्यास चुकीचा संदेश जाईल. पर्यटकांना या जिल्ह्याकडे आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा द्याव्यात अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली