शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

अधिवेशनात जिल्ह्यातील ५३ प्रश्नांवर आवाज उठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:06 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विशेषत: विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आपण आॅनलाईन जवळपास ५३ प्रश्न अधिवेशनात मांडले आहेत.

ठळक मुद्देदेवराव होळी यांची माहिती : ग्रामीण भागात उद्योग निर्मितीवर भर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विशेषत: विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आपण आॅनलाईन जवळपास ५३ प्रश्न अधिवेशनात मांडले आहेत. यात २७ प्रश्न तारांकित, १८ लेक्षवेधी तर ८ प्रश्न अर्धातास चर्चेसाठी ठेवले आहेत. या प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील मागील अनेक वर्र्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर प्रश्न मार्गी लागावे, यासाठी अधिवेशनादरम्यान आवाज उठविला जाईल, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यावेळी दिली.मागील अनेक वषार्पासून शहरी भागात उद्योगांसाठी जागा (एमआयडीसी) निश्चित करण्यात आली आहे. यातील अनेक भूखंड उद्योजकांनी घेतले आहे. मात्र, उद्योग सुरू झाले नाही. त्यामुळे या परिसरात उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ग्रामीण भागात; विशेषत: पेसांतर्गत येणाºया गावांमध्ये लघू उद्योग निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, यासाठी सर्वतोपरी आपण सहकार्य करणार आहे, अशी माहिती स्थानिक सर्कीटहाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.'व्हिलेज इंडस्ट्रीज' या प्रकल्पाच्या माध्यमातून पोर्ला येथे कोसा उत्पादन केंद्रासह त्याच्यापासून धागा व कापड तयार करण्याचा उद्योग सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर उत्पादीत होणाºया सामुग्रीवर उद्योग व्यवसाय कसे सुरू करता येईल, यासाठी सुद्धा आपले प्रयत्न सुरू झाले आहे. असेही ते म्हणाले. यासोबतच जिल्हा निवड मंडळ, रिक्त पदे भरण्यासाठी जिल्ह्याला विशेष सूट देण्यात यावी, जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शिष्यवृत्ती, बंगाली बांधवांना कायमस्वरूपी पट्टे, सिंचनासाठी वनजमिनीत सूट आदी प्रश्न अधिवेशनात उपस्थित केले जाणार आहे. अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. यापत्रकार परिषदेला ओबीसी सेलचे भाष्कर बुरे, जनार्धन साखरे, डॉ. मसराम आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.जमिनी वर्ग १ करण्याची मागणीजिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाºया ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यात येणार आहे. नुकतेच शासनाने महसूल मंडळ घोषीत केले. त्याच धर्तीवर गटग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, जिल्ह्यातील अनेक शेतकºयांच्या जमिनी वर्ग- २ मध्ये आहेत. शासनाने त्या जमिनी वर्ग १ करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारी वेगवेगळ्या अटी, शर्ती व नियम सांगत आहेत. त्यामुळे जमिनी वर्ग २ होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. हा मुद्दा अधिवेशनादरम्यान लावून धरला जाईल.ग्रामीण रूग्णालयात पात्रतापूर्ण वैद्यकीय अधिकारी देण्यात यावी, यासाठीसुद्धा आपण प्रश्न टाकला आहे. किमान एका रूग्णालयात एम.बी.बी. एस. शैक्षणिक पात्रता असलेला वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी