शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:19 IST

भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला व नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. हे अधिकार, हक्क व आरक्षण कायम राहतील. आदिवासी समाजावर कदापी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची ग्वाही : जागतिक आदिवासी दिन समारंभ उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला व नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. हे अधिकार, हक्क व आरक्षण कायम राहतील. आदिवासी समाजावर कदापी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन व विविध आदिवासी संघटनांच्या वतीने स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात शुक्रवारी आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष घनश्याम मडावी होते. प्रमुख अथिती म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, आर. एल. पुराम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, आॅल इंडिया आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष माधव गावळ, जिल्हा अध्यक्ष भरत येरमे, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शालिक उसेंडी, नगर सेवक गुलाब मडावी, पं. सं. सदस्य मारोतराव इचोडकर, सुषमा मेश्राम, हलबा- हलबी समाज संघटनेचे अध्यक्ष शालिक मानकर, आदिवासी परधान जमात पंचायतचे जिल्हा अध्यक्ष विलास कोडाप, सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, कुसूम अलाम, भागवत कुमरे, डॉ. किरण मडावी, वसंत कुलसंगे, प्रकाश गेडाम, सदानंद ताराम, आनंद कंगाले, जयश्री येरमे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना नामदार मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे असून अमूल्य आहे, असे महानथोर पुरूषांनी सांगितले. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून येथील आदिवासी नागरिकांचा विकास व्हावा, यासाठी आपण गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठ निर्माण केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून गडचिरोली हे ज्ञानाचे मोठे केंद्र व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे व तसे प्रयत्न सुरू आहेत. जल, जंगल, जमीन व पर्यावरणाचे रक्षण करणारे चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव सात्विक व प्रामाणिक आहेत व त्यांच्यात शौर्य आहे. त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांचा विकास व्हावा, यासाठी आपण मिशन शौर्य अभियान सुरू केले. यात दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी सहभागी होणार आहेत. आदिवासींच्या विकासासाठी रोजगार महत्त्वाचा आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोेंदिया हे तीन जिल्हे मिळून रोजगार निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांची योजना तयार केली जात आहे, असे नामदार मुनगंटीवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अगोदर इंदिरा गांधी चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक सदानंद ताराम तर संचालन वनिश्याम येरमे व वर्षा राजगडकर यांनी केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारवैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळालेल्या व इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी अमर विठ्ठल नैताम, लोकेश चबनलाल मारर्गिया, सौरभ घोडाम, नागेश दिलीप मरस्कोल्हे, संस्कृति अरूण गेडाम, अंजली रमेश नरोटे, आचल कन्नाके, पुनम नामदेव उसेंडी, वैशाली बंडू नरोटे, विशाल शांताराम पुडो, कृतिका पिंताबर गेडाम, आलिशा सुरेश कोवासे, कामिनी पेंदाम, धनंजय घनश्याम मडावी आदि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आदिवासींसाठी सभागृह बांधणारआदिवासींची संस्कृती व विचाराचे मंथन होऊन विकासाला वाव मिळण्यासाठी गडचिरोली येथे सभागृह असणे आवश्यक आहे. आदिवासी समाज बांधवांनी गडचिरोलीत जागा उपलब्ध करून द्यावी. आपण शासनाच्या वतीने येथे सुसज्ज सभागृह बांधून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.कार्यक्रमात यांचा झाला सत्कारसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये विट्ठलराव नैताम, माणिराव तोडासे, दादाजी गेडाम, पांडुरंग मेश्राम, कवडूजी येरमे, तुळशिराम आलाम तर सामाजिक व अन्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आंशी वासुदेव मडकाम, हरीश सिडाम, गुलाब मडावी यांच्या शाल व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार