शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

रोपवनामुळे वन्यजीवांचा निवारा होतोय नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:11 IST

जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात : वन विभागाचे नियोजन फेल

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.मानवीकृत रोपवन तयार करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. असे रोपवन तयार करण्यासाठी कोरका कटाईच्या नावाखाली दरवर्षी झुडपी जंगल नष्ट केले जाते. कोरका कटाई म्हणजे, जे जमीन व पसरलेली लहान झुडपी रोप तसेच तीन ते चार फुटापर्यंतचे झाडे वन विभागाच्या वतीने मजुरांकरवी तोडून टाकले जातात. यात तृणभक्षी प्राण्यांचे अन्न व निवाराही नष्ट होत आहे. जंगलातील हरीण, ससा, घोरपड यासारख्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तृणभक्षी प्राण्यांवर ज्याचे जीवन आहे, ते मांसभक्षी प्राणी आपल्या अन्नाच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.मागील २० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मानवीकृत रोपवाटीका वन विभागाने तयार केल्या, पण यामुळे जंगलातील झाडांची संख्या वाढली का? सद्यस्थितीत किती वृक्ष जीवंत आहेत? याबाबतचा निकाल शुन्य आहे. मानवीकृत रोपवाटीकेमुळे वनसंवर्धनाचा कोणताच फायदा आजवर झाला नाही. शिवाय हिरवीगार जंगले व झुडपी जंगले नष्ट झाली. परिणामी तृणभक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत रोपवाटीका तयार करण्यापेक्षा वन विभागाने मोकळ्या ओसाड जागेवर अधिकाधिक रोपवन लावून जंगल क्षेत्र वाढवावे, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांनी केली आहे.