शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

रोपवनामुळे वन्यजीवांचा निवारा होतोय नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:11 IST

जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात : वन विभागाचे नियोजन फेल

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.मानवीकृत रोपवन तयार करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. असे रोपवन तयार करण्यासाठी कोरका कटाईच्या नावाखाली दरवर्षी झुडपी जंगल नष्ट केले जाते. कोरका कटाई म्हणजे, जे जमीन व पसरलेली लहान झुडपी रोप तसेच तीन ते चार फुटापर्यंतचे झाडे वन विभागाच्या वतीने मजुरांकरवी तोडून टाकले जातात. यात तृणभक्षी प्राण्यांचे अन्न व निवाराही नष्ट होत आहे. जंगलातील हरीण, ससा, घोरपड यासारख्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तृणभक्षी प्राण्यांवर ज्याचे जीवन आहे, ते मांसभक्षी प्राणी आपल्या अन्नाच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.मागील २० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मानवीकृत रोपवाटीका वन विभागाने तयार केल्या, पण यामुळे जंगलातील झाडांची संख्या वाढली का? सद्यस्थितीत किती वृक्ष जीवंत आहेत? याबाबतचा निकाल शुन्य आहे. मानवीकृत रोपवाटीकेमुळे वनसंवर्धनाचा कोणताच फायदा आजवर झाला नाही. शिवाय हिरवीगार जंगले व झुडपी जंगले नष्ट झाली. परिणामी तृणभक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत रोपवाटीका तयार करण्यापेक्षा वन विभागाने मोकळ्या ओसाड जागेवर अधिकाधिक रोपवन लावून जंगल क्षेत्र वाढवावे, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांनी केली आहे.