शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

रोपवनामुळे वन्यजीवांचा निवारा होतोय नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:11 IST

जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात : वन विभागाचे नियोजन फेल

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.मानवीकृत रोपवन तयार करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. असे रोपवन तयार करण्यासाठी कोरका कटाईच्या नावाखाली दरवर्षी झुडपी जंगल नष्ट केले जाते. कोरका कटाई म्हणजे, जे जमीन व पसरलेली लहान झुडपी रोप तसेच तीन ते चार फुटापर्यंतचे झाडे वन विभागाच्या वतीने मजुरांकरवी तोडून टाकले जातात. यात तृणभक्षी प्राण्यांचे अन्न व निवाराही नष्ट होत आहे. जंगलातील हरीण, ससा, घोरपड यासारख्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तृणभक्षी प्राण्यांवर ज्याचे जीवन आहे, ते मांसभक्षी प्राणी आपल्या अन्नाच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.मागील २० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मानवीकृत रोपवाटीका वन विभागाने तयार केल्या, पण यामुळे जंगलातील झाडांची संख्या वाढली का? सद्यस्थितीत किती वृक्ष जीवंत आहेत? याबाबतचा निकाल शुन्य आहे. मानवीकृत रोपवाटीकेमुळे वनसंवर्धनाचा कोणताच फायदा आजवर झाला नाही. शिवाय हिरवीगार जंगले व झुडपी जंगले नष्ट झाली. परिणामी तृणभक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत रोपवाटीका तयार करण्यापेक्षा वन विभागाने मोकळ्या ओसाड जागेवर अधिकाधिक रोपवन लावून जंगल क्षेत्र वाढवावे, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांनी केली आहे.