शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत राष्ट्रीय महामार्गाची रूंदी अडकली ५.५ मीटरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:22 IST

मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग वनकायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देवनकायद्याची अडचणपरवानगी मिळेपर्यंत डांबरी रस्त्यावरच भागविणार

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग वनकायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. आतापर्यंत ५.५ मीटर रूंद असणारे रस्ते राष्ट्रीय महामार्ग करून २४ मीटर रूंद करण्यासाठी हजारो झाडांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामुळे रस्ता रूंदीकरणासाठी वनविभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही. परिणामी त्या क्षेत्रात रस्त्यांची रूंदी तूर्त ‘जैसे थे’ ठेवून डांबरी रस्त्यावरच भागवावे लागणार आहे.गडचिरोली जिल्ह्याचा ७६ टक्के भूभाग वनांनी आच्छादला आहे. अशाही स्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गडचिरोली विभागांतर्गत ७ राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी देऊन त्यांचे नव्याने बांधकाम करण्यास सांगितले आहे. यातील नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन मार्गांना अडचण नसली तरी गडचिरोली जिल्ह्यातून जाणाºया इतर पाच मार्गांना वनकायद्याचा फटका बसणार आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० हा छत्तीसगड सीमेवरील मुरूमगावपासून ते चंद्रपूरपर्यंत आहे. २६२ किलोमीटरच्या या मार्गातील जवळपास ४० टक्के भाग जंगलातून जातो. महामार्ग क्रमांक ३५३ सी भंडारा जिल्ह्यातील साकोलीपासून सुरू होऊन लाखांदूर, वडसा, आरमोरी, गडचिरोली मार्गे आलापल्ली, सिरोंचापर्यंत जातो. २३७ किलोमीटरच्या या मार्गात ६० टक्केपेक्षा जास्त जंगलाचा भाग आहे. याशिवाय चंद्रपूर ते आष्टी हा महामार्ग क्रमांक ३५३ बी, ब्रह्मपुरी ते कोरची हा महामार्ग क्रमांक ५४३ आणि आलापल्ली, भामरागड, लाहेरी हा महामार्ग क्रमांक १३० डी यामधील बहुतांश भाग जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे हे राष्ट्रीय महामार्ग २४ मीटर रूंद करण्यासाठी वनविभागाने परवानगी दिल्यास कित्येक हजार झाडांची कत्तल करावी लागणार आहे. शेकडो वर्षांपासून जिल्ह्याच्या वनवैभवात भर घालणाºया झाडांची कत्तल करण्याची परवानगी वनविभाग देण्याची शक्यता कमीच आहे. वनविभागाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.२४ मीटरच्या परवानगीशिवाय सिमेंट रोड नाहीराष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार रस्ता किमान २४ मीटर रूंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे तेवढ्या रूंदीची परवानगी मिळाली तरच त्या भागात सिमेंटचा रस्ता तयार होऊ शकेल. तूर्त जंगलाच्या भागातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर ५.५ मीटर रूंदीतच रस्त्यांची डागडुजी केली जाईल. त्या ठिकाणी सिमेंटीकरणही केले जाणार नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांनी दिली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक