शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

मेंटेनन्सवर लाखाेंचा खर्च तरीही का खंडित हाेते वीज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

प्रत्येक गावाला लाेखंडी खांबाद्वारे वीज पुरवठा केला आहे. विजेच्या तारेचा लाेखंडी खांबाशी संपर्क येऊ नये, यासाठी खांबाला चिनी मातीने बनलेले इन्सुलेटर बसविले आहे. या इन्सुलेटरला वीज तार गुंफली जाते. माती विजेची दुर्वाहक असल्यामुळे वीज प्रवाह खांबापर्यंत पाेहाेचत नाही. मात्र काही दिवसानंतर इन्सुलेटर पाऊस पडताच फुटतात. त्यामुळे वीज प्रवाह जमिनीत पाेहाेचून लाईन बंद पडते. हवेमुळे विजेच्या तारांचा एकमेकांशी संपर्क हाेऊन स्पार्किंग हाेते व वीज पुरवठा खंडित हाेतो. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वीज पुरवठा करणाऱ्या साधनांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी आटाेपले जाते. यावर महावितरणचे लाखाे रूपये खर्च हाेतात. तरीही वादळवारा किंवा पाऊस सुरू हाेताच तसेच भर उन्हाळ्यातही वीज पुरवठा अचानक खंडित हाेतो. देखभाल दुरूस्ती केली असतानाही वीज पुरवठा का खंडित हाेतो, असा सहज प्रश्न ग्राहकांना पडताे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा आपाेआप खंडित हाेत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील वीज लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात विजेची समस्या अतिशय गंभीर हाेते. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किमान एक दिवस वीज पुरवठा सुरळीत हाेत नाही. जंगलात विजेचा बिघाड शाेधताना वीज कर्मचाऱ्यांच्याही नाकीनऊ येतात.

लाईट जाण्याची नेमकी कारणे काय?

प्रत्येक गावाला लाेखंडी खांबाद्वारे वीज पुरवठा केला आहे. विजेच्या तारेचा लाेखंडी खांबाशी संपर्क येऊ नये, यासाठी खांबाला चिनी मातीने बनलेले इन्सुलेटर बसविले आहे. या इन्सुलेटरला वीज तार गुंफली जाते. माती विजेची दुर्वाहक असल्यामुळे वीज प्रवाह खांबापर्यंत पाेहाेचत नाही. मात्र काही दिवसानंतर इन्सुलेटर पाऊस पडताच फुटतात. त्यामुळे वीज प्रवाह जमिनीत पाेहाेचून लाईन बंद पडते.हवेमुळे विजेच्या तारांचा एकमेकांशी संपर्क हाेऊन स्पार्किंग हाेते व वीज पुरवठा खंडित हाेतो. वीज खांबावर वीज पडल्यामुळे इन्सुलेटर  फुटतात. उन्हाळ्यात अचानक विजेचा वापर वाढल्याने डीपीवरील फ्युज उडतात व वीज पुरवठा खंडित हाेतो.  विजेचा शाॅक बसल्याची एखादी दुर्घटना घडल्यानंतर वीज पुरवठा खंडित हाेतो. 

लाईट लगेच येऊन का जाते?एखादी दुर्घटना घडताच वीज पुरवठा खंडित हाेते. उपकेंद्रावरील ऑपरेटर पाच मिनिटानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरू करून बघते. मात्र पुन्हा लाईट बंद पडल्यास वीज लाईनमध्ये काहीतरी बिघाड निर्माण झाला असल्याचा अंदाज येऊन महावितरणचे कर्मचारी कामाला लागतात.

ऑपरेटर वीज पुरवठा खंडित करताे का?पाऊस, वादळवाऱ्याला सुरूवात झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित हाेते. यावेळी उपकेंद्रातील ऑपरेटर वीज पुरवठा खंडित करते, असा गैरसमज नागरिकांचा आहे. मात्र ऑपरेटर कधीच वीज पुरवठा खंडित करीत नाही. इन्सुलेटर फुटणे, वीज तारा तुटने अशा घटना घडल्यानंतर आपाेआप वीज पुरवठा खंडित हाेते.

   वीज पुरवठा बंद झाला नाही तर.... -    एखाद्या खांबावरील इन्सुलेटर फुटल्यानंतरही वीज पुरवठा सुरूच राहिल्यास हा वीज पुरवठा खांब, सभाेवतालच्या ओल्या परिसरात पसरेल. एवढ्या परिसरात एखादा प्राणी किंवा व्यक्ती गेल्यास त्याला विजेचा धक्का लागून ताे गतप्राण हाेऊ शकतो. त्यामुळे इन्सुलेटर फुटल्याने वीज पुरवठा आपाेआप खंडित हाेईल, अशी सिस्टिम महावितरणकडे आहे. -   एखाद्या व्यक्तीला शाॅक लागला तर लागलीच वीज पुरवठा खंडित हाेतो. त्यामुळे त्याचा प्राण वाचू शकतो. -    वीज पुरवठा खंडित न झाल्यास माेठी जीवितहानी हाेण्याची भीती राहते.

 

टॅग्स :electricityवीज