शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

दोन टक्के कर्मचाऱ्यांचा सरकारला एवढा पुळका का?

By admin | Updated: January 6, 2016 01:50 IST

केंद्र शासनाचे ४७ लाख कर्मचारी असून ४५ लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सातवा वेतन आयोग लागू केल्यास केंद्र ....

पत्रपरिषद : अनिल किलोर यांचा सरकारला सवालगडचिरोली : केंद्र शासनाचे ४७ लाख कर्मचारी असून ४५ लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सातवा वेतन आयोग लागू केल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर १ लाख ३ हजार कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. देशातील ६० टक्के शेतकरी वर्ग देशोधडीला जात असताना त्यांच्यासाठी कोणत्याही ठोस सुविधा न देता घाईने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. दोन टक्के कर्मचारी वर्गांचा सरकारला एवढा पुळका का, असा सवाल जनमंच नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरकारला केला.अ‍ॅड. किलोर म्हणाले, देशात गेल्या २० वर्षात दुष्काळ व नापिकीमुळे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर एकाही कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली नाही. २००४ साली स्थापन झालेल्या स्वामीनाथन आयोगाचे चार अहवाल आतापर्यंत शासनाला सादर झाले आहेत. मात्र सदर आयोग लागू करण्यासाठी शासन दुर्लक्ष करीत आहेत. याउलट ७ आॅक्टोबर २००६ रोजी स्थापन झालेला सहावा वेतन आयोग १ जानेवारी २००६ पासून लागू करण्यात आला. यावरून शेतकऱ्यांप्रती केंद्र व राज्य सरकार कमालीचे उदासीन आहे. सातव्या वेतन आयोगाला आमचा विरोध नाही. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी आमची मागणी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी जि.प.चे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, अरूण मुनघाटे, प्रकाश इटनकर, पंकज गुड्डेवार, प्रकाश नागपुरे, प्रल्हाद खरसने, राहूल जडे, रामभाऊ आकरे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)