शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

गोंडवानाच्या गोंधळाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:03 IST

सहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या आणि अभ्यास मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक अखेर रविवारी पार पडली.

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या आणि अभ्यास मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक अखेर रविवारी पार पडली. विद्यापीठाची ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदार जास्त असणाºया केंद्रांवर चांगलाच गोंधळ उडाला. परिणामी ४० टक्के मतदारांनी मतदान न करताच केंद्रांवरून माघारी फिरणे पसंत केले. यासाठी विद्यापीठ प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या २०८ महाविद्यालयांमधील एक लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविणाºया गोंडवाना विद्यापीठाचा कारभार दिवसेंदिवस अधिक चांगला होण्यासाठी योग्य ते बदल करावेत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी अभ्यासक्रमात योग्य त्या गोष्टींचा समावेश करावा, प्रशासकीय कारभारावर नियंत्रण असावे यासाठी विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळांची निवड केली जाते. अडीच वर्षांपासून विद्यापीठाचा कारभार थेट नियुक्त केलेल्या समित्यांमार्फतच सुरू होता. मर्जीतील लोक समित्यांवर असल्यामुळे कोणत्या कामाला कोणाचा विरोध नाही, की कोणत्या सुधारणा नाही. सर्वच कारभार ‘आॅल ईज वेल’ म्हणत सुरू होता. पण रविवारी पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत विद्यापीठात कार्यक्षम आणि दूरदृष्टी असणारे लोक निवडता येईल म्हणून ११ हजारांवर पदवीधर मतदार मतदानासाठी सज्ज होते. मात्र त्यांच्या उत्साहावर विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे विरजण पडले.अधिसभा, विद्वत परिषद आणि विविध अभ्यास मंडळांसाठी मतदान करताना मतदारांची तारांबळ उडत होती. पदवीधर मतदाराला एकूण ३१ उमेदवारांमधून पसंतीक्रमानुसार १० उमेदवारांची निवड करायची होती. प्राध्यापकांना २० तर प्राचार्यांना ३० उमेदवारांना मतदान करायचे होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला ५ ते १० मिनिटे लागत होती. परिणामी रांगेत २ ते ३ तास उभे राहून प्रतीक्षा करणे शक्य नसलेल्या मतदारांनी गर्दी कमी झाल्यानंतर येऊ, असा विचार करून काढता पाय घेतला. पण नंतर केंद्रावर आले तरीही तीच अवस्था त्यांना दिसत होती. वास्तविक मतदानासाठी लागणारा वेळ लक्षात घेता जास्तीत जास्त किती मतदारांसाठी एक केंद्र असावे याचा अंदाज विद्यापीठाचा कारभार चालविणाºया अनुभवी लोकांना असणे गरजेचे होते. परंतू ११ हजार मतदारांसाठी अवघे ३६ केंद्र देण्यात आले. परिणामी मतदान अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी झाले.गडचिरोली जिल्ह्यात अवघे १२ मतदार असणाºया भामरागड आणि २९ मतदार असणाºया मुलचेरात प्रत्येकी एक मतदान केंद्र तर सर्वाधिक १३९६ मतदार असणाºया गडचिरोलीसाठी फक्त २ केंद्र ठेवण्यात आले. विद्यापीठाच्या अपुºया कर्मचाºयांमुळे पुरेसे मतदान केंद्र देता आले नाही, असे कारण देऊन कुलगुरू मोकळे झाले. पण निवडणुकीसारख्या महत्वाच्या प्रक्रियेसाठी केवळ विद्यापीठाच्या कर्मचाºयांच्या भरोशावर न राहता इतर सरकारी कर्मचाºयांची, अधिकाºयांची मदत घेणे अशक्य नव्हते. मात्र तसा प्रयत्नही विद्यापीठाच्या हुशार प्रशासनाने केला नाही. आता जे लोक विद्यापीठावर निवडल्या जाणार त्यांच्या निवडीत आपले योगदान नाही याचे शल्य मतदानापासून वंचित राहिलेल्या तमाम मतदारांना बोचत राहणार. यापुढे तरी विद्यापीठ प्रशासनाचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा ठेवुया.