शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

गोंडवानाच्या गोंधळाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:03 IST

सहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या आणि अभ्यास मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक अखेर रविवारी पार पडली.

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या आणि अभ्यास मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक अखेर रविवारी पार पडली. विद्यापीठाची ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदार जास्त असणाºया केंद्रांवर चांगलाच गोंधळ उडाला. परिणामी ४० टक्के मतदारांनी मतदान न करताच केंद्रांवरून माघारी फिरणे पसंत केले. यासाठी विद्यापीठ प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या २०८ महाविद्यालयांमधील एक लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविणाºया गोंडवाना विद्यापीठाचा कारभार दिवसेंदिवस अधिक चांगला होण्यासाठी योग्य ते बदल करावेत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी अभ्यासक्रमात योग्य त्या गोष्टींचा समावेश करावा, प्रशासकीय कारभारावर नियंत्रण असावे यासाठी विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळांची निवड केली जाते. अडीच वर्षांपासून विद्यापीठाचा कारभार थेट नियुक्त केलेल्या समित्यांमार्फतच सुरू होता. मर्जीतील लोक समित्यांवर असल्यामुळे कोणत्या कामाला कोणाचा विरोध नाही, की कोणत्या सुधारणा नाही. सर्वच कारभार ‘आॅल ईज वेल’ म्हणत सुरू होता. पण रविवारी पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत विद्यापीठात कार्यक्षम आणि दूरदृष्टी असणारे लोक निवडता येईल म्हणून ११ हजारांवर पदवीधर मतदार मतदानासाठी सज्ज होते. मात्र त्यांच्या उत्साहावर विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे विरजण पडले.अधिसभा, विद्वत परिषद आणि विविध अभ्यास मंडळांसाठी मतदान करताना मतदारांची तारांबळ उडत होती. पदवीधर मतदाराला एकूण ३१ उमेदवारांमधून पसंतीक्रमानुसार १० उमेदवारांची निवड करायची होती. प्राध्यापकांना २० तर प्राचार्यांना ३० उमेदवारांना मतदान करायचे होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला ५ ते १० मिनिटे लागत होती. परिणामी रांगेत २ ते ३ तास उभे राहून प्रतीक्षा करणे शक्य नसलेल्या मतदारांनी गर्दी कमी झाल्यानंतर येऊ, असा विचार करून काढता पाय घेतला. पण नंतर केंद्रावर आले तरीही तीच अवस्था त्यांना दिसत होती. वास्तविक मतदानासाठी लागणारा वेळ लक्षात घेता जास्तीत जास्त किती मतदारांसाठी एक केंद्र असावे याचा अंदाज विद्यापीठाचा कारभार चालविणाºया अनुभवी लोकांना असणे गरजेचे होते. परंतू ११ हजार मतदारांसाठी अवघे ३६ केंद्र देण्यात आले. परिणामी मतदान अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी झाले.गडचिरोली जिल्ह्यात अवघे १२ मतदार असणाºया भामरागड आणि २९ मतदार असणाºया मुलचेरात प्रत्येकी एक मतदान केंद्र तर सर्वाधिक १३९६ मतदार असणाºया गडचिरोलीसाठी फक्त २ केंद्र ठेवण्यात आले. विद्यापीठाच्या अपुºया कर्मचाºयांमुळे पुरेसे मतदान केंद्र देता आले नाही, असे कारण देऊन कुलगुरू मोकळे झाले. पण निवडणुकीसारख्या महत्वाच्या प्रक्रियेसाठी केवळ विद्यापीठाच्या कर्मचाºयांच्या भरोशावर न राहता इतर सरकारी कर्मचाºयांची, अधिकाºयांची मदत घेणे अशक्य नव्हते. मात्र तसा प्रयत्नही विद्यापीठाच्या हुशार प्रशासनाने केला नाही. आता जे लोक विद्यापीठावर निवडल्या जाणार त्यांच्या निवडीत आपले योगदान नाही याचे शल्य मतदानापासून वंचित राहिलेल्या तमाम मतदारांना बोचत राहणार. यापुढे तरी विद्यापीठ प्रशासनाचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा ठेवुया.