शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

नवीन पालकमंत्री कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:17 IST

विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.

ठळक मुद्देमुनगंटीवारांची मागणी : अहेरी मतदारसंघातील पिछेहाटीमुळे राजेंना डच्चू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.नवीन पालकमंत्र्यांना आपली छाप पाडण्यासाठी अत्यल्प काळ मिळणार असला तरी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी आल्यास जिल्ह्याला लाभ होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. निधीअभावी रेंगाळलेली अनेक कामे शेवटच्या टप्प्यात मार्गी लागल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघातील ६ पैकी ५ विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी आहे. परंतू केवळ अहेरी या एकमेव मतदार संघात भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना ६ हजारांहून अधिक मते जास्त मिळाली आहेत. त्यामुळे अहेरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे राज्यमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे त्यांच्याकडे असलेले पालकत्वही निघाले आहे.आघाडी सरकारच्या काळात या जिल्ह्याचे पालकत्व आर.आर.पाटील यांनी स्वीकारले होते. त्यावेळी अनेक मोठ्या कामांची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्यानंतर सरकार बदलताच अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे पालकत्व आल्याने जिल्हावासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतू ती अपेक्षापूर्ती करण्यात त्यांना यश येऊ शकले नाही. त्याचाही अंदाज पक्षाने घेतला होता. अहेरी मतदार संघात झालेली भाजपची ही पिछेहाट थांबविण्यासाठी भाजप कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे अहेरी मतदार संघावर भाजपचे आधीही फारसे वर्चस्व नव्हते. या मतदार संघावर राष्टÑवादी काँग्रेसची पकड बºयापैकी आहे. राजेंचे मंत्रिपद गेल्याने राष्टÑवादीचे वर्चस्व आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दुसरीकडे भाजपकडे या मतदार संघात दुसरा कोणी सक्षम चेहरा नाही. त्यामुळे राजेंच्या हाती पुन्हा भाजपचा झेंडा येणार की ते नाग विदर्भ आंदोलन समितीचा झेंडा पुढे करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले अहे.मुख्यमंत्र्यांनी दिला होता इशारालोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला आपापल्या विधानसभा क्षेत्रात मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांवर टाकली होती. तसे न झाल्यास विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्याचा इशाराही दिला होता. असे असताना अहेरी मतदार संघात भाजपची पिछेहाट झाली. त्याचा परिणाम म्हणून अम्ब्रिशराव आत्राम यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय इतरही काही गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.