शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नवीन पालकमंत्री कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:17 IST

विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.

ठळक मुद्देमुनगंटीवारांची मागणी : अहेरी मतदारसंघातील पिछेहाटीमुळे राजेंना डच्चू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.नवीन पालकमंत्र्यांना आपली छाप पाडण्यासाठी अत्यल्प काळ मिळणार असला तरी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी आल्यास जिल्ह्याला लाभ होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. निधीअभावी रेंगाळलेली अनेक कामे शेवटच्या टप्प्यात मार्गी लागल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघातील ६ पैकी ५ विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी आहे. परंतू केवळ अहेरी या एकमेव मतदार संघात भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना ६ हजारांहून अधिक मते जास्त मिळाली आहेत. त्यामुळे अहेरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे राज्यमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे त्यांच्याकडे असलेले पालकत्वही निघाले आहे.आघाडी सरकारच्या काळात या जिल्ह्याचे पालकत्व आर.आर.पाटील यांनी स्वीकारले होते. त्यावेळी अनेक मोठ्या कामांची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्यानंतर सरकार बदलताच अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे पालकत्व आल्याने जिल्हावासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतू ती अपेक्षापूर्ती करण्यात त्यांना यश येऊ शकले नाही. त्याचाही अंदाज पक्षाने घेतला होता. अहेरी मतदार संघात झालेली भाजपची ही पिछेहाट थांबविण्यासाठी भाजप कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे अहेरी मतदार संघावर भाजपचे आधीही फारसे वर्चस्व नव्हते. या मतदार संघावर राष्टÑवादी काँग्रेसची पकड बºयापैकी आहे. राजेंचे मंत्रिपद गेल्याने राष्टÑवादीचे वर्चस्व आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दुसरीकडे भाजपकडे या मतदार संघात दुसरा कोणी सक्षम चेहरा नाही. त्यामुळे राजेंच्या हाती पुन्हा भाजपचा झेंडा येणार की ते नाग विदर्भ आंदोलन समितीचा झेंडा पुढे करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले अहे.मुख्यमंत्र्यांनी दिला होता इशारालोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला आपापल्या विधानसभा क्षेत्रात मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांवर टाकली होती. तसे न झाल्यास विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्याचा इशाराही दिला होता. असे असताना अहेरी मतदार संघात भाजपची पिछेहाट झाली. त्याचा परिणाम म्हणून अम्ब्रिशराव आत्राम यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय इतरही काही गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.