शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

नवीन पालकमंत्री कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:17 IST

विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.

ठळक मुद्देमुनगंटीवारांची मागणी : अहेरी मतदारसंघातील पिछेहाटीमुळे राजेंना डच्चू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान राज्य सरकारचा जेमतेम दोन ते तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना राज्यातील इतर काही मंत्र्यांसह गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. आता नवीन पालकमंत्री म्हणून कुणाकडे जबाबदारी येणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वने आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरत आहे.नवीन पालकमंत्र्यांना आपली छाप पाडण्यासाठी अत्यल्प काळ मिळणार असला तरी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही जबाबदारी आल्यास जिल्ह्याला लाभ होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. निधीअभावी रेंगाळलेली अनेक कामे शेवटच्या टप्प्यात मार्गी लागल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघातील ६ पैकी ५ विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी आहे. परंतू केवळ अहेरी या एकमेव मतदार संघात भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना ६ हजारांहून अधिक मते जास्त मिळाली आहेत. त्यामुळे अहेरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे राज्यमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे त्यांच्याकडे असलेले पालकत्वही निघाले आहे.आघाडी सरकारच्या काळात या जिल्ह्याचे पालकत्व आर.आर.पाटील यांनी स्वीकारले होते. त्यावेळी अनेक मोठ्या कामांची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्यानंतर सरकार बदलताच अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे पालकत्व आल्याने जिल्हावासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतू ती अपेक्षापूर्ती करण्यात त्यांना यश येऊ शकले नाही. त्याचाही अंदाज पक्षाने घेतला होता. अहेरी मतदार संघात झालेली भाजपची ही पिछेहाट थांबविण्यासाठी भाजप कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे अहेरी मतदार संघावर भाजपचे आधीही फारसे वर्चस्व नव्हते. या मतदार संघावर राष्टÑवादी काँग्रेसची पकड बºयापैकी आहे. राजेंचे मंत्रिपद गेल्याने राष्टÑवादीचे वर्चस्व आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दुसरीकडे भाजपकडे या मतदार संघात दुसरा कोणी सक्षम चेहरा नाही. त्यामुळे राजेंच्या हाती पुन्हा भाजपचा झेंडा येणार की ते नाग विदर्भ आंदोलन समितीचा झेंडा पुढे करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले अहे.मुख्यमंत्र्यांनी दिला होता इशारालोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला आपापल्या विधानसभा क्षेत्रात मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांवर टाकली होती. तसे न झाल्यास विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्याचा इशाराही दिला होता. असे असताना अहेरी मतदार संघात भाजपची पिछेहाट झाली. त्याचा परिणाम म्हणून अम्ब्रिशराव आत्राम यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय इतरही काही गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.