शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

नववी उत्तीर्ण झालेले १२०० विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी दहावीपर्यंत नक्कीच पाेहाेचताे. सन २०१९-२० मध्ये सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाचे मिळून जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण हाेऊन दहावीत गेले. त्यापैकी दहावीच्या परीक्षेला १४ हजार ८०० विद्यार्थी नाेंदणीकृत झाले. उर्वरित १२०० विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या ८०० वर शाळा आहेत. काेराेना संकटाच्या महामारीमुळे सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रामध्ये मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी कुलूपबंद झाल्या. त्यावेळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी दहावीत गेले. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दीपावलीनंतर या विद्यार्थ्यांकडून बाेर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली. अंतिम मुदतीपर्यंत जिल्हाभरात १४ हजार ८०० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करून नाेंदणी केली. दहावीतील प्रवेशीत विद्यार्थी व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये जिल्ह्यात तफावत दिसून येत आहे.

काेट

काेराेना संकटाच्या महामारीमुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील इयत्ता दहावीचे काही विद्यार्थी शाळेच्या संपर्कापासून दूर गेले. शाळांनी सूचना दिली असली तरी काही विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा फार्म भरला नाही. लाॅकडाऊन काळात शाळा बंद असल्याने अनेकांनी मध्ये शाळा साेडली असावी. त्यामुळे या सर्व कारणामुळे इयत्ता नववी उत्तीर्ण व दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणीकृत झालेल्या विद्यार्थी संख्येमध्ये तफावत दिसून येत आहे.

- रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. गडचिराेली

स्थलांतर व आर्थिक अडचणीचे कारण

पूर्वीप्रमाणे आजही काही विद्यार्थी मध्येच शाळा साेडतात. याला विविध बाबी व कारणे आहेत. काैटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असणे, आर्थिक चणचण भासल्यामुळे काही विद्यार्थी शाळेला रामराम ठाेकतात. छाेटे-माेठे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी विद्यार्थी तयार हाेत असल्याने शाळेकडे दुर्लक्ष हाेते. याशिवाय कुटुंबातील सदस्य राेजगारासाठी भटकंती व स्थलांतर करतात. अशा कुटुंबातील विद्यार्थी मधेच शाळा साेडतात.

पटसंख्येचा घाेळ?

- इयत्ता नववीपर्यंत काेणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधे शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी त्याला शाळाबाह्य दाखविले जात नाही.

- दुर्गम, अतिदुर्गम भागातील काही शाळांमध्ये पटावर विद्यार्थ्यांची नाेंदणी असते. मात्र, काही विद्यार्थी वर्षभर शाळेत जात नाहीत. पूर्वी विद्यार्थी पटसंख्येचा घाेळ अनेक ठिकाणी दिसून यायचा. मात्र, आता ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे व युडायस, तसेच शासनाच्या विविध साॅफ्टवेअरमध्ये विद्यार्थी संख्येचा डेटा अपलाेड केला जात असल्याने विद्यार्थी पटसंख्येमध्ये पारदर्शकता आली आहे.

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी १६०००

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी १४८००