शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नववी उत्तीर्ण झालेले १२०० विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी दहावीपर्यंत नक्कीच पाेहाेचताे. सन २०१९-२० मध्ये सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाचे मिळून जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण हाेऊन दहावीत गेले. त्यापैकी दहावीच्या परीक्षेला १४ हजार ८०० विद्यार्थी नाेंदणीकृत झाले. उर्वरित १२०० विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या ८०० वर शाळा आहेत. काेराेना संकटाच्या महामारीमुळे सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रामध्ये मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी कुलूपबंद झाल्या. त्यावेळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी दहावीत गेले. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दीपावलीनंतर या विद्यार्थ्यांकडून बाेर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली. अंतिम मुदतीपर्यंत जिल्हाभरात १४ हजार ८०० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करून नाेंदणी केली. दहावीतील प्रवेशीत विद्यार्थी व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये जिल्ह्यात तफावत दिसून येत आहे.

काेट

काेराेना संकटाच्या महामारीमुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील इयत्ता दहावीचे काही विद्यार्थी शाळेच्या संपर्कापासून दूर गेले. शाळांनी सूचना दिली असली तरी काही विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा फार्म भरला नाही. लाॅकडाऊन काळात शाळा बंद असल्याने अनेकांनी मध्ये शाळा साेडली असावी. त्यामुळे या सर्व कारणामुळे इयत्ता नववी उत्तीर्ण व दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणीकृत झालेल्या विद्यार्थी संख्येमध्ये तफावत दिसून येत आहे.

- रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. गडचिराेली

स्थलांतर व आर्थिक अडचणीचे कारण

पूर्वीप्रमाणे आजही काही विद्यार्थी मध्येच शाळा साेडतात. याला विविध बाबी व कारणे आहेत. काैटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असणे, आर्थिक चणचण भासल्यामुळे काही विद्यार्थी शाळेला रामराम ठाेकतात. छाेटे-माेठे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी विद्यार्थी तयार हाेत असल्याने शाळेकडे दुर्लक्ष हाेते. याशिवाय कुटुंबातील सदस्य राेजगारासाठी भटकंती व स्थलांतर करतात. अशा कुटुंबातील विद्यार्थी मधेच शाळा साेडतात.

पटसंख्येचा घाेळ?

- इयत्ता नववीपर्यंत काेणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधे शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी त्याला शाळाबाह्य दाखविले जात नाही.

- दुर्गम, अतिदुर्गम भागातील काही शाळांमध्ये पटावर विद्यार्थ्यांची नाेंदणी असते. मात्र, काही विद्यार्थी वर्षभर शाळेत जात नाहीत. पूर्वी विद्यार्थी पटसंख्येचा घाेळ अनेक ठिकाणी दिसून यायचा. मात्र, आता ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे व युडायस, तसेच शासनाच्या विविध साॅफ्टवेअरमध्ये विद्यार्थी संख्येचा डेटा अपलाेड केला जात असल्याने विद्यार्थी पटसंख्येमध्ये पारदर्शकता आली आहे.

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी १६०००

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी १४८००