शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नववी उत्तीर्ण झालेले १२०० विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी दहावीपर्यंत नक्कीच पाेहाेचताे. सन २०१९-२० मध्ये सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाचे मिळून जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण हाेऊन दहावीत गेले. त्यापैकी दहावीच्या परीक्षेला १४ हजार ८०० विद्यार्थी नाेंदणीकृत झाले. उर्वरित १२०० विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या ८०० वर शाळा आहेत. काेराेना संकटाच्या महामारीमुळे सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रामध्ये मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी कुलूपबंद झाल्या. त्यावेळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी दहावीत गेले. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दीपावलीनंतर या विद्यार्थ्यांकडून बाेर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली. अंतिम मुदतीपर्यंत जिल्हाभरात १४ हजार ८०० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करून नाेंदणी केली. दहावीतील प्रवेशीत विद्यार्थी व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये जिल्ह्यात तफावत दिसून येत आहे.

काेट

काेराेना संकटाच्या महामारीमुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील इयत्ता दहावीचे काही विद्यार्थी शाळेच्या संपर्कापासून दूर गेले. शाळांनी सूचना दिली असली तरी काही विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा फार्म भरला नाही. लाॅकडाऊन काळात शाळा बंद असल्याने अनेकांनी मध्ये शाळा साेडली असावी. त्यामुळे या सर्व कारणामुळे इयत्ता नववी उत्तीर्ण व दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणीकृत झालेल्या विद्यार्थी संख्येमध्ये तफावत दिसून येत आहे.

- रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. गडचिराेली

स्थलांतर व आर्थिक अडचणीचे कारण

पूर्वीप्रमाणे आजही काही विद्यार्थी मध्येच शाळा साेडतात. याला विविध बाबी व कारणे आहेत. काैटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असणे, आर्थिक चणचण भासल्यामुळे काही विद्यार्थी शाळेला रामराम ठाेकतात. छाेटे-माेठे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी विद्यार्थी तयार हाेत असल्याने शाळेकडे दुर्लक्ष हाेते. याशिवाय कुटुंबातील सदस्य राेजगारासाठी भटकंती व स्थलांतर करतात. अशा कुटुंबातील विद्यार्थी मधेच शाळा साेडतात.

पटसंख्येचा घाेळ?

- इयत्ता नववीपर्यंत काेणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधे शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी त्याला शाळाबाह्य दाखविले जात नाही.

- दुर्गम, अतिदुर्गम भागातील काही शाळांमध्ये पटावर विद्यार्थ्यांची नाेंदणी असते. मात्र, काही विद्यार्थी वर्षभर शाळेत जात नाहीत. पूर्वी विद्यार्थी पटसंख्येचा घाेळ अनेक ठिकाणी दिसून यायचा. मात्र, आता ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे व युडायस, तसेच शासनाच्या विविध साॅफ्टवेअरमध्ये विद्यार्थी संख्येचा डेटा अपलाेड केला जात असल्याने विद्यार्थी पटसंख्येमध्ये पारदर्शकता आली आहे.

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी १६०००

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी १४८००