शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भामरागडातील १२८ गावांची व्यथा कधी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:25 IST

पर्लकोटा नदीच्या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह तालुक्यातील सुमारे १२८ गावांचा जगाशी संपर्क तुटतो.

पर्लकोटा नदीवरील ठेंगणा पूल : दरवर्षीच तालुकावासीयांना करावा लागतो पुराचा सामनालोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीच्या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह तालुक्यातील सुमारे १२८ गावांचा जगाशी संपर्क तुटतो. पावसाळ्यात किमान २० दिवस ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहतात. ही व्यथा आणखी किती दिवस सोसावी लागणार, असा प्रश्न तालुक्यातील जनता उपस्थित करीत आहे. भामरागड तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. या तालुक्यात पुलाच्या मार्गाने प्रवेश करायचा म्हटला तर भामरागडजवळील पर्लकोटा नदीचे पूल ओलांडावेच लागते. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाल्यास पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढते व सदर पूल बुडतो. एवढेच नाही तर छत्तीसगड राज्यात पाऊस झाल्यास याचाही फटका भामरागड तालुक्यातील जनतेला बसतो. इंद्रावती नदी छत्तीसगड व महाराष्ट्राचे विभाजन करणारी नदी आहे. इंद्रावतीला पूर आल्यास पर्लकोटाला दाब निर्माण होते. पामुलगौतम नदीच्याही पाण्यामुळे पर्लकोटावरील ठेंगणा पूल पाण्याने वेढते. एकंदरीतच पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्यांचा फटका भामरागड तालुक्याला बसतो. पर्लकोटा नदीवरील पुलाला भामरागड तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाते. मात्र हे प्रवेशद्वार अतिशय ठेंगणे आहे. या पुलाची उंची वाढविण्याचे आश्वासन आजपर्यंतच्या अनेक लोकप्रतिनिधींनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवातच झाली नाही. अहेरी विधानसभा क्षेत्राला मंत्री पद मिळाले. त्यामुळे पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात आता दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी पूल मंजूर होण्याच्या हालचाली सुध्दा सुरू झाल्या नाहीत. सिरोंचाजवळील गोदावरी नदीवरील पूल, प्राणहिता नदीवरील अहेरी तालुक्यातील गुडेमजवळील पुलांची मागणी पर्लकोटाच्या पुलाच्या नंतरची मागणी आहे. मात्र तेलंगणा राज्यातील आमदारांनी या दोन्ही पुलांकडे लक्ष दिल्याने प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. तर गोदावरी नदीवरील पूल पूर्णत्वास आले आहे. सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदीवरील पुलाचेही भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. जिल्ह्याच्या सभोवताल पुलांचे बांधकाम होत असताना पर्लकोटा वरील पूल मात्र दुर्लक्षितच राहिला आहे.