शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

भामरागडातील १२८ गावांची व्यथा कधी संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:25 IST

पर्लकोटा नदीच्या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह तालुक्यातील सुमारे १२८ गावांचा जगाशी संपर्क तुटतो.

पर्लकोटा नदीवरील ठेंगणा पूल : दरवर्षीच तालुकावासीयांना करावा लागतो पुराचा सामनालोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीच्या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह तालुक्यातील सुमारे १२८ गावांचा जगाशी संपर्क तुटतो. पावसाळ्यात किमान २० दिवस ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहतात. ही व्यथा आणखी किती दिवस सोसावी लागणार, असा प्रश्न तालुक्यातील जनता उपस्थित करीत आहे. भामरागड तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. या तालुक्यात पुलाच्या मार्गाने प्रवेश करायचा म्हटला तर भामरागडजवळील पर्लकोटा नदीचे पूल ओलांडावेच लागते. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाल्यास पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढते व सदर पूल बुडतो. एवढेच नाही तर छत्तीसगड राज्यात पाऊस झाल्यास याचाही फटका भामरागड तालुक्यातील जनतेला बसतो. इंद्रावती नदी छत्तीसगड व महाराष्ट्राचे विभाजन करणारी नदी आहे. इंद्रावतीला पूर आल्यास पर्लकोटाला दाब निर्माण होते. पामुलगौतम नदीच्याही पाण्यामुळे पर्लकोटावरील ठेंगणा पूल पाण्याने वेढते. एकंदरीतच पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्यांचा फटका भामरागड तालुक्याला बसतो. पर्लकोटा नदीवरील पुलाला भामरागड तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाते. मात्र हे प्रवेशद्वार अतिशय ठेंगणे आहे. या पुलाची उंची वाढविण्याचे आश्वासन आजपर्यंतच्या अनेक लोकप्रतिनिधींनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवातच झाली नाही. अहेरी विधानसभा क्षेत्राला मंत्री पद मिळाले. त्यामुळे पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात आता दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी पूल मंजूर होण्याच्या हालचाली सुध्दा सुरू झाल्या नाहीत. सिरोंचाजवळील गोदावरी नदीवरील पूल, प्राणहिता नदीवरील अहेरी तालुक्यातील गुडेमजवळील पुलांची मागणी पर्लकोटाच्या पुलाच्या नंतरची मागणी आहे. मात्र तेलंगणा राज्यातील आमदारांनी या दोन्ही पुलांकडे लक्ष दिल्याने प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. तर गोदावरी नदीवरील पूल पूर्णत्वास आले आहे. सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदीवरील पुलाचेही भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. जिल्ह्याच्या सभोवताल पुलांचे बांधकाम होत असताना पर्लकोटा वरील पूल मात्र दुर्लक्षितच राहिला आहे.