शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वीज समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:13 IST

तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात बाराही महिने वीज समस्या असते. या भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो.

ठळक मुद्देविद्युत विभागाचे दुर्लक्ष : अहेरी तालुक्यात विजेचा लपंडाव

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात बाराही महिने वीज समस्या असते. या भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो. गुड्डीगुडम व राजाराम परिसरात या समस्येचा सामना नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र याकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या भागाचा विकासही खुंटला आहे.गुड्डीगुडम व राजाराम भागात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत समस्या या भागातील नागरिकांना भेडसावत आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तथा लोकप्रतिनिधी या भागातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असून दिवसेंदिवस या समस्या वाढत चालल्यात आहेत. या भागातील समस्या अद्यापही न सुटल्याने दळणवळणाचीही समस्या निर्माण झाली आहे. गुड्डीगुडम व राजाराम परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु हा सर्व परिसर घनदाट जंगलाने व्यापला असल्याने कोणत्याही किरकोळ कारणानेही दिवस-रात्र वीज पुरवठा खंडित राहतो. वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता, आलापल्ली, अहेरी येथून ये-जा करतात. त्यामुळे एकदा खंडित झालेला वीज पुरवठा दोन ते तीन दिवसापर्यंत सुरळीत होत नाही. अनेकदा चार ते आठ दिवस वीज पुरवठा खंडित असते. विजेसंबंधी कामे करण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील समस्या कोण सोडविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी विद्युत शाखा कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन सर्वच नागरिकांनी ग्राम पंचायतीमार्फत ठराव पारीत करून जिमलगट्टा येथून आलेली वीज जोडणी नंदीगाव परिसरातून देण्याची मागणी केली होती. परंतु यावेळी अधिकाºयांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले, मात्र या समस्येकडे दुर्लक्ष झाले.स्थायी लाईनमन नियुक्त करागुड्डीगुडम, राजाराम परिसरातील १५ ते २० गावे सांभाळण्याकरिता वीज वितरण विभागाच्या वतीने अत्यल्प कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यल्प कर्मचाºयांवरच संपूर्ण परिसराचा भार सांभाळला जात आहे. शिवाय मागील अनेक वर्षांपासून उर्वरित कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे येथे स्थायी लाईनमन नियुक्त करण्याची मागणी होत आहे.