शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

गाभाऱ्याचे काम कधी पूर्ण होणार?

By admin | Updated: June 5, 2017 00:45 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथील देवस्थानच्या जीर्णाेद्धाराचे काम सतरा महिन्यांपासून रेंगाळले आहे.

दर्शनासाठी भाविकांना अडचण : पुरातत्त्व विभागाचा कानाडोळालोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथील देवस्थानच्या जीर्णाेद्धाराचे काम सतरा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.भारतीय पुरातत्त्व विभाग नागपूर सर्कलने जानेवारी २०१६ मध्ये मंदिर जीर्णोद्धार कामाला सुरूवात केली. मार्र्कंडेश्वर मंदिराचा गाभारा खोलून ठेवला. जीर्णाेद्धाराचे काम दोन महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले. परंतु १७ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम रेंगाळलेलेच आहे. मार्र्कंडेश्वर मंदिराचे रेंगाळलेले काम होत नसल्याची दखल घेऊन मार्र्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी डिसेंबर २०१६ मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच दिल्ली येथे त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यानंतरही काम सुरू झाले नाही. या संदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खा. अशोक नेते यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही. सध्या मंदिराचा संपूर्ण कळस उकलून आहे. नागपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षिका नंदिनी शाहू यांच्या कार्यकाळात या कामाला सुरूवात झाली होती. परंतु काही कारणास्तव त्यांची बदली झाल्याने जीर्णोद्धाराच्या कामाची जबाबदारी रायपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेली. मात्र त्यानंतर कामाला संथगती आली. काम पुन्हा जोमाने सुरू व्हावे म्हणून डिसेंबर महिन्यात मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यांनासुद्धा या भेटीत प्रतिसाद मिळाला नाही. सध्या हे काम बंद आहे. मार्कंडादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनाही फॅक्सद्वारे काम तत्काळ पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली. परंतु अद्यापही कुठल्याही हालचाली दिसून येत नाही. पुरातत्त्व विभागाविषयी जनाक्रोश- भडकेऐतिहासिक वैैभवाची पार्श्वभूमी लाभलेल्या जागतिक कीर्तीचे वास्तूशिल्प मंदिर, दुर्ग, गड, किल्ले व अवशेषाच्या व संपूर्ण संरक्षणाची व देखरेखीची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथील जीर्णाेद्धाराचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलने जानेवारी २०१६ मध्ये सुरू केले. मंदिराचा गाभारा खोलून ठेवण्यात आला. परंतु १७ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. यंदाच्या महाशिवरात्रीला दर्शनाकरिता आलेल्या लाखो भाविकांना गाभाऱ्याचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाविषयी भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन तत्काळ गाभाऱ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी सेवानिवृत्त बीडीओ तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य काशिनाथ भडके यांनी केली आहे.