शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नवीन खरीप हंगामासाठी जि.प.चे नियोजन काय?

By admin | Updated: May 19, 2017 00:19 IST

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला.

अडीच महिन्यांपासून बैठक नाही : पदाधिकारी कक्ष दुरूस्तीत व्यस्त लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र अद्याप नवीन पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरूवात केलेली नाही. अडीच महिन्यांपासून सर्वसाधारण सभाही झालेली नाही. विशेष म्हणजे नवीन खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने कोणतेही नियोजन केलेले नाही. जिल्हा परिषदेत सध्या अनेक कामे ठप्प पडली आहेत. नवीन पदाधिकारी आपापल्या कक्षाचे नविनीकरण केल्याशिवाय कक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. काही दिवसातच शेतकऱ्यांना बियाण्यांची गरज पडणार आहे. वेळेवर बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. बेभाव बियाणे घ्यावे लागतात. त्यात फसगतही होते. पण जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने त्यादृष्टीने कोणतेही नियोजन केले नाही, असा आरोप वसा-पार्ला जि.प.क्षेत्राचे सदस्य आणि माजी कृषी सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागाचे गावागावत जाणारे फिरते वैद्यकीय पथक बंद झाले. पाऊस आल्यानंतर गुरांचे आजारही वाढतात. त्यामुळे त्यांना रोगप्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. मात्र त्याचे नियोजन नाही. अनेक लघु पाटबंधारे विभागाच्या तलावांचे व बंधाऱ्यांचे काम अर्धवट आहे. तलाव खोलीकरणासाठी देण्यात येणारा १५ ते २० लाखांचा निधी अपुरा आहे. त्यातून पुरेसे खोलीकरण होत नसल्याने पाण्याचा प्रत्यक्ष संग्रह होत नाही. हा निधी वाढवून द्यावा अशी मागणी बोरकुटे यांनी केली आहे. मुरूमासाठी अनेक नैसर्गिक पहाड खोदून काढले जातात. त्याऐवजी तलावांमधील मुरूमाची फुकट रॉयल्टी दिली असती तर तलाव खोलीकरणाचा खर्च वाचला असता आणि पहाडही वाचविता आले असते असे बोरकुटे लोकमतशी बोलताना म्हणाले.