शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नवीन खरीप हंगामासाठी जि.प.चे नियोजन काय?

By admin | Updated: May 19, 2017 00:19 IST

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला.

अडीच महिन्यांपासून बैठक नाही : पदाधिकारी कक्ष दुरूस्तीत व्यस्त लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र अद्याप नवीन पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरूवात केलेली नाही. अडीच महिन्यांपासून सर्वसाधारण सभाही झालेली नाही. विशेष म्हणजे नवीन खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने कोणतेही नियोजन केलेले नाही. जिल्हा परिषदेत सध्या अनेक कामे ठप्प पडली आहेत. नवीन पदाधिकारी आपापल्या कक्षाचे नविनीकरण केल्याशिवाय कक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. काही दिवसातच शेतकऱ्यांना बियाण्यांची गरज पडणार आहे. वेळेवर बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. बेभाव बियाणे घ्यावे लागतात. त्यात फसगतही होते. पण जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने त्यादृष्टीने कोणतेही नियोजन केले नाही, असा आरोप वसा-पार्ला जि.प.क्षेत्राचे सदस्य आणि माजी कृषी सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागाचे गावागावत जाणारे फिरते वैद्यकीय पथक बंद झाले. पाऊस आल्यानंतर गुरांचे आजारही वाढतात. त्यामुळे त्यांना रोगप्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. मात्र त्याचे नियोजन नाही. अनेक लघु पाटबंधारे विभागाच्या तलावांचे व बंधाऱ्यांचे काम अर्धवट आहे. तलाव खोलीकरणासाठी देण्यात येणारा १५ ते २० लाखांचा निधी अपुरा आहे. त्यातून पुरेसे खोलीकरण होत नसल्याने पाण्याचा प्रत्यक्ष संग्रह होत नाही. हा निधी वाढवून द्यावा अशी मागणी बोरकुटे यांनी केली आहे. मुरूमासाठी अनेक नैसर्गिक पहाड खोदून काढले जातात. त्याऐवजी तलावांमधील मुरूमाची फुकट रॉयल्टी दिली असती तर तलाव खोलीकरणाचा खर्च वाचला असता आणि पहाडही वाचविता आले असते असे बोरकुटे लोकमतशी बोलताना म्हणाले.