शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

दुसागुडातील विहिरींनी तळ गाठला

By admin | Updated: April 29, 2016 01:39 IST

तालुक्यातील दुसागुडा येथील तीन विहिरींच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली असून त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.

हातपंप नादुरूस्त : गावात पाण्याची टंचाई, पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्षएटापल्ली : तालुक्यातील दुसागुडा येथील तीन विहिरींच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली असून त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. तर तीन पैकी एक हातपंप पूर्णपणे बंद आहे. दोन हातपंपामधूनही पाहिजे त्या प्रमाणात पाणी निघत नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी, परसलगोंदी, जांभिया, मवेली, कुदरी, रेकनार, कसानसूर, घोटसूर व दुसागुडा या गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यातील दुसागुडा हे जवळपास ७०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावांमध्ये तीन विहिरी आहेत. मात्र या तिन्ही विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. एक हातपंप बंद आहे. दोन हातपंपातून अत्यंत कमी पाणी येते. एक बकेट पाणी काढण्यासाठी १५ ते २० मिनीट हातपंप हलवावे लागते. हातपंप दुरूस्त करण्याबाबत पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र पंचायत समिती प्रशासनाचे सदर हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. विहिरीतील गाळ उपसल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. गाळ उपसणेही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायतीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. सोमा पदा, चंद्रा चंदू पोटावी, मागरू रैनू पोटावी, सादू नरोटे यांनी हातपंप दुरूस्तीची मागणी केली आहे.दुर्गम भागातील गावांकडे प्रशासनाचे दुर्लक्षएटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम भागातील आहेत. या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र या गावांकडे प्रशासातील अधिकारी लक्ष देत नाही. गावातील नागरिकही याबाबतची तक्रार पंचायत समिती प्रशासनाकडे करीत नाही. त्यामुळे या गावांमध्ये असलेली पाणीटंचाई लक्षात येत नसली तरी पाणीटंचाई गंभीर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणे अत्यंत आवश्यक झाले आहे. दुसागुडा येथील हातपंपावर सकाळपासूनच महिलांची गर्दी जमण्यास सुरुवात होते. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली.