शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

कुटुंबांचे कल्याण साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:36 IST

आधुनिक युगात विविध साधनांच्या माध्यमातून मानवाची प्रगती होत आहे.

ठळक मुद्देकेंद्राचे उद्घाटन : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आधुनिक युगात विविध साधनांच्या माध्यमातून मानवाची प्रगती होत आहे. मात्र वैचारिक मतभेद असल्याने बºयाचदा कुटुंबाची वाताहत होते. परिणामी समाजावरही परिणाम होतात. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे व स्नेहाचे कायम ठेवून कुटुंबाचा कल्याण साधण्याचे कार्य झाले पाहिजे, हे कौटुंबिक कल्याण समितीचे महत्त्वाचे काम आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने नुकतेच कौटुंबिक कल्याण समिती केंद्राचे उद्घाटन न्याय सेवा सदन गडचिरोली येथे करण्यात आले. शिवाय यावेळी कौटुंबिक कल्याण समितीची स्थापना करून प्रशिक्षणही घेण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड, न्या. एस. टी. सूर, मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एम. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) एन. सी. बोरफलकर, दुसरे दिवाणी न्यायाधीश एन. पी. वासाळे, के. आर. सिंघेल, कौटुंबिक कल्याण समितीच्या सदस्य वैशाली पदवाड, वैशाली सूर, सुरेखा बारसागडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय मेहरे यांनी कौटुंबिक कल्याण समितीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी ४९८ अ मध्ये पोलिसांची भूमिका काय असली पाहिजे, याबाबत सविस्तरपणे मौलिक मार्गदर्शन केले. एस. टी. सूर यांनी कौटुंबिक समितीमध्ये पदाधिकाºयांची भूमिका कोणती असेल, याबाबतची माहिती दिली. मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी कौटुंबिक कल्याण समितीच्या स्थापनेचा हेतू विशद केला. संचालन न्या. ता. के. जगदाडे यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपीक बी. व्ही. वाळके यांनी मानले. कर्मचाºयांनी सहकार्य केले.