शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीनच कर्मचाऱ्यांवर शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार

By admin | Updated: November 18, 2014 22:54 IST

शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

गडचिरोली : शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. शहरातील अनेक पथदिवे बंद असतांनाही कार्यालयामध्ये मात्र याबाबतची कोणतीही नोंद नाही.गडचिरोली शहर दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे. त्यानुसार नगर पालिका प्रशासन पथदिव्यांचा सुद्धा विस्तार करीत आहे. शहरात एकूण ३ हजार विद्युत खांब असून त्यांना जवळपास ३ हजार ५०० पथदिवे लावण्यात आले आहेत. यापूर्वी नगर परिषदेमध्ये पथदिव्यांची देखभाल करण्यासाठी सहा कर्मचारी कार्यरत होते. यातील तीन कर्मचारी नियमित तर तीन कर्मचारी रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आले होते. नियमित असलेले कर्मचारी विद्युतचे तज्ज्ञ होते. मात्र या तिनही कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांपूर्वी दुसऱ्या कार्यालयात बदली करण्यात आली. त्यामुळे या विभागाचा प्रभार नाईलाजास्तव मिळकत व्यवस्थापकाकडे सोपविण्यात आला. मात्र त्यांना विद्युत विभागाचा फारसा अनुभव नसल्याने विद्युत दिव्यांची देखभाल करतेवेळी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यांच्या दिमतीला दोन रोजंदारी कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र शहराचा व्याप व पथदिव्यांची संख्या लक्षात घेतली तर हा सर्व डोलारा या तीन कर्मचाऱ्यांना सांभाळतेवेळी बरीच कसरत करावी लागत आहे. शहरातील ३ हजार ५०० विद्युत दिव्यांपैकी ५०० पेक्षा अधिक दिवे बंद स्थितीत आहेत. मात्र याबाबतची कोणतीही नोंद नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडे उपलब्ध नाही. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, रात्रीच्या सुमारास शहरात फिरून किती पथदिवे बंद आहेत, हे बघितले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या खांबाला दिवसा बल्ब लावल्या जातो, अशी माहिती दिली. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरमोरी मार्गावरील वनविभागाच्या नाक्यापासून ते कठाणी नदीपर्यंतचे संपूर्ण विद्युत दिवे मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत. मात्र सदर पथदिवे अजूनही दुरूस्त करण्यात आली नाही. त्याचबरोबर शहराच्या प्रत्येक वॉर्डातील अनेक दिवे बंद आहेत. याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.मुल मार्गावरील बहुतांश पथदिवे झाडांनी झाकली आहेत. त्यामुळे या दिव्यांचा प्रकाशच पडत नाही. वॉर्डातील बंद दिव्यांबाबत नागरिक या ठिकाणी तक्रार घेऊन येतात. मात्र सदर तक्रारीचे निराकरण वेळेवर होत नसल्याने नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)