शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
3
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
4
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
5
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
6
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
8
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
9
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
11
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
12
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
13
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
14
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
15
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
16
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
17
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
18
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
19
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
20
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा

तीनच कर्मचाऱ्यांवर शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार

By admin | Updated: November 18, 2014 22:54 IST

शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

गडचिरोली : शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. शहरातील अनेक पथदिवे बंद असतांनाही कार्यालयामध्ये मात्र याबाबतची कोणतीही नोंद नाही.गडचिरोली शहर दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे. त्यानुसार नगर पालिका प्रशासन पथदिव्यांचा सुद्धा विस्तार करीत आहे. शहरात एकूण ३ हजार विद्युत खांब असून त्यांना जवळपास ३ हजार ५०० पथदिवे लावण्यात आले आहेत. यापूर्वी नगर परिषदेमध्ये पथदिव्यांची देखभाल करण्यासाठी सहा कर्मचारी कार्यरत होते. यातील तीन कर्मचारी नियमित तर तीन कर्मचारी रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आले होते. नियमित असलेले कर्मचारी विद्युतचे तज्ज्ञ होते. मात्र या तिनही कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांपूर्वी दुसऱ्या कार्यालयात बदली करण्यात आली. त्यामुळे या विभागाचा प्रभार नाईलाजास्तव मिळकत व्यवस्थापकाकडे सोपविण्यात आला. मात्र त्यांना विद्युत विभागाचा फारसा अनुभव नसल्याने विद्युत दिव्यांची देखभाल करतेवेळी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यांच्या दिमतीला दोन रोजंदारी कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र शहराचा व्याप व पथदिव्यांची संख्या लक्षात घेतली तर हा सर्व डोलारा या तीन कर्मचाऱ्यांना सांभाळतेवेळी बरीच कसरत करावी लागत आहे. शहरातील ३ हजार ५०० विद्युत दिव्यांपैकी ५०० पेक्षा अधिक दिवे बंद स्थितीत आहेत. मात्र याबाबतची कोणतीही नोंद नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडे उपलब्ध नाही. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, रात्रीच्या सुमारास शहरात फिरून किती पथदिवे बंद आहेत, हे बघितले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या खांबाला दिवसा बल्ब लावल्या जातो, अशी माहिती दिली. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरमोरी मार्गावरील वनविभागाच्या नाक्यापासून ते कठाणी नदीपर्यंतचे संपूर्ण विद्युत दिवे मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत. मात्र सदर पथदिवे अजूनही दुरूस्त करण्यात आली नाही. त्याचबरोबर शहराच्या प्रत्येक वॉर्डातील अनेक दिवे बंद आहेत. याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.मुल मार्गावरील बहुतांश पथदिवे झाडांनी झाकली आहेत. त्यामुळे या दिव्यांचा प्रकाशच पडत नाही. वॉर्डातील बंद दिव्यांबाबत नागरिक या ठिकाणी तक्रार घेऊन येतात. मात्र सदर तक्रारीचे निराकरण वेळेवर होत नसल्याने नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)