शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

आठवडी बाजारातील उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 01:56 IST

८ नोव्हेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या.

भाजीपाला विक्रीत घट : ५०० व १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्याचा परिणामगडचिरोली : ८ नोव्हेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या. यामुळे १०० च्या नोटा व सुट्या पैशांचा प्रचंड तुटवडा जिल्हाभरात निर्माण झाला आहे. नव्या नोटा काढण्यासाठी तसेच ५०० व १००० च्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी ग्राहकांची बँकेसमोर गर्दी होत आहे. ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यामुळे गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावली असल्याचे दिसून आले. अनेक विक्रेत्यांनी नेहमीपेक्षा आज ५० टक्केच व्यवसाय केल्याचे विक्रेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे.गडचिरोलीच्या आठवडी बाजारात अनेक ग्राहक ५०० व १००० च्या जुन्या नोटा घेऊन भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी आले होते. त्यांनी सदर नोटा खपवून साहित्य खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील विक्रेत्यांनी सदर ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी त्यांच्याजवळ असलेल्या १०० ते १५० रूपयांतच मिळेल तेवढा भाजीपाला खरेदी केला. प्रत्येक आठवडी बाजारात अडीचशे रूपयांचा भाजीपाला घेणाऱ्या अनेक ग्राहकांनी आज १०० रूपयांतच भाजीपाल्याची खरेदी आटोपली तसेच काही मोजके ग्राहक अनेक दुकानावरून भाजीपाला खरेदी न करता परतले. दुकानदारांशी सदर प्रतिनिधीने संवाद साधल्यानंतर ग्राहकाकडून ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारणे बंद केल्याची माहिती त्यांनी दिली. १०० रूपयाच्या नोटांच्या तुटवड्यामुळे सदर आठवडी बाजारात भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी दिसून आली. एकूणच नोटा बंदच्या निर्णयाने आठवडी बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावल्याचे दिसून आले. (स्थानिक प्रतिनिधी)केंद्र सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे नागपूरच्या ठोक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांकडून सदर नोटा स्वीकारणे बंद केले आहे. उधारीवर माल न्या, मात्र ५०० व १००० च्या जुन्या नोटा देऊ नका, असे ठोक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला सांगत आहेत. सदर नोटा बंद केल्याने भाजीपाला विक्रीत घट आली आहे.- देविदास लांजेवार, भाजीपाला विक्रेते, ब्रह्मपुरी५०० व १००० च्या जुन्या नोटा घेऊन आलेल्या ग्राहकांना आपण भाजीपाल्याची विक्री केली नाही. सदर नोटा ठोक व्यापारी घेत नसल्याने या नोटा स्वीकारून बँकेत रांगेमध्ये लागणे परवडेजोगे नाही. बाजार व इतर कामे सोडून बँकेत जाण्यासाठी सवडही नाही. त्यामुळे आपण जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून खरेदी कमी झाली.- दामदेव मेश्राम, भाजीपाला विक्रेते, गांगलवाडीकेंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने आठवडाभरापासून अनेक ठिकाणच्या आठवडी बाजारात साहित्य विक्री कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून आपण कापड विक्रीत अर्धाच व्यवसाय केला आहे. १०० व ५० च्या नोटांचा तुटवडा असल्याने अनेक ग्राहक खरेदी विना परत गेले.- विजय गुलदेवकर, रेडिमेड कापड विक्रेते, गडचिरोली