शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

रोवणी कामानंतर निंदणी कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:41 IST

शेतकरी रोवणी झाल्यानंतर निंदणी काम आटाेपल्यावर पिकाला खताची मात्रा देत असतात. या वर्षी पाऊस जेमतेम येत असल्याने पिकात तणांची ...

शेतकरी रोवणी झाल्यानंतर निंदणी काम आटाेपल्यावर पिकाला खताची मात्रा देत असतात. या वर्षी पाऊस जेमतेम येत असल्याने पिकात तणांची जोमाने वाढ झाली आहे. यासाठी शेतकरी सकाळच्या सुमारास निंदणी काम करताना दिसून येत आहेत. तर काही शेतकरी अजूनही अंतिम टप्प्यातील रोवणी काम करताना दिसून येत आहेत. रोवणी कामानंतर अजूनही दमदार पाऊस आला नाही त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. तसेच वर पाण्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील शेतात पाण्यामुळे पीक करपण्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली असून वातावरणात बदल होऊन प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. पावसाच्या महिन्यात श्रावणसरीऐवजी घामाच्या धारा वाहू लागत आहेत. वातावरणातील बदल पिकांसाठी घातक ठरत असून पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पिकांवर फवारणी करून पीक रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वातावरणातील बदल शेतकऱ्यांना अडचणीचे जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत. पुढील सप्टेंबर महिना पाऊस माघारी असणारा महिना आहे. भर पावसाळ्यात अजूनही जलस्रोत अपेक्षित पाणी दिसून येत नाही. शेतकऱ्यांना धानपीक जगविण्यासाठी मोठ्या धडपडीचा सामना करावा लागणार असून शेतकरी रोवणी करूनही मोठ्या चिंतेत दिसून येत आहे.

बाॅक्स :

महिलांना १५० रुपये मजुरी

दिवसभर ऊन तापू लागले असून उकाडा वाढत आहे. त्यामुळे अशा अवस्थेत निंदण कामासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. काही शेतकरी निंदण काम सकाळच्या सुमारास करीत आहेत, तर काही ठिकाणी दुपारच्या पाळीत कामे सुरू आहेत. या कामासाठी महिलांना १५० रुपये मजुरी दिली जात आहे.