शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यामुळे मौल्यवान वनसंपत्ती होताहेत नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST

कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांपासून प्रमाण वाढले : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.मागील १० वर्षांपासून जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी मार्च महिन्यात खुटकटाई करण्यात येत होती. पण आता खुटकटाई नावापुरतीच राहिली आहे. खुट कटाईचा त्रास वाचविण्यासाठी व तेंदूच्या रोपांना जास्त खुटवे येण्याच्या मोहापायी जंगलांना चक्क आगही लावल्या जाते. मोहफूल गोळा करणारी मंडळी झाडाखालचा पालापाचोळा जाळतात. त्यामुळे ही आग पसरून वणवा लागतो.१० वर्षांपूर्वी मोहफुले गोळा करणारी मंडळी पालापाचोळा जाळीत असतात. पण त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागत नव्हती. शेतकरी शेतीची म्हशागत करण्यासाठी शेतातील गवत जाळतात. पण शेतकरी एप्रिल व मे महिन्यात गवत जाळून शेताची स्वच्छता करतात. मार्च महिन्यात हे काम केले जात नाही. मात्र आता मार्च महिन्यातच जंगलांना आगी लागत असल्याने संपूर्ण गवत पालापाचोळा जळून जातो. ज्याच्यावर विविध प्रकारचे किटक, सरपटणारे प्राणी, जमिनीवर अंडी देणारे पक्षी, ससा, हरीण, काळवीट, निलगाय आदींसारख्या शाकाहारी प्राणी वणव्यामुळे नामशेष होत आहेत. या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे वाघ, बिबट आदीसारखे हिंस्त्र प्राणी भक्ष शोधण्यासाठी गावाकडे धाव घेतात.ज्या ग्रामसभेची हद्दित जंगलाला आग लागत असेल ती आग विझविण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामसभेची राहिल. जर आग विझविली नाही तर त्या ग्रामसभेविरूध्द कार्यवाही होणे आवश्यक आहे. संबंधित दोषी व्यक्तीवरही कारवाई व्हावी, आग लावणाऱ्याचे नाव जो सांगेत असेल त्याचे नाव गोपनिय ठेवून त्याला शासनाकडून रोख बक्षीसे देण्याची योजना अंमलात आणणे आवश्यक आहे.या गोष्टी केल्याशिवाय जंगलाला आगी लागण्याचे प्रकार बंद होणार नाही.झाडांना वाचविण्याची जबाबदारी ग्रामसभांची नाही का?मोहफुले गोळा करणारी मंडळी असो की, तेंदूपत्ता संकलन करणारी मंडळी असो, सर्वच लोक ग्रामसभा व महाग्रामसभांशी जुळलेले आहेत. तेंदूपत्ता हंगामापासून मिळणारा पैसा ग्रामसभांना मिळतो. मग जंगल जळत असेल तर तो विझविण्याची जबाबदारी ग्रामसभेची नाही का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोरची तालुक्यातील मसेली परिसरातील नवेझरी, पल्यालजोब, मुरकुटी आदीसह आठ गाव परिसरातून टॉवर लाईन जाणार आहे. परिणामी या गाव परिसरातील जेवढे वृक्ष तोडल्या जातील, त्या वृक्षाच्या मोबदल्यात या आठ ग्रामसभांना चार कोटी रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. आर्थिक लाभ होत असलेल्या ग्रामसभांची जंगल वाचविण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.