शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यामुळे मौल्यवान वनसंपत्ती होताहेत नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST

कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांपासून प्रमाण वाढले : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.मागील १० वर्षांपासून जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी मार्च महिन्यात खुटकटाई करण्यात येत होती. पण आता खुटकटाई नावापुरतीच राहिली आहे. खुट कटाईचा त्रास वाचविण्यासाठी व तेंदूच्या रोपांना जास्त खुटवे येण्याच्या मोहापायी जंगलांना चक्क आगही लावल्या जाते. मोहफूल गोळा करणारी मंडळी झाडाखालचा पालापाचोळा जाळतात. त्यामुळे ही आग पसरून वणवा लागतो.१० वर्षांपूर्वी मोहफुले गोळा करणारी मंडळी पालापाचोळा जाळीत असतात. पण त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागत नव्हती. शेतकरी शेतीची म्हशागत करण्यासाठी शेतातील गवत जाळतात. पण शेतकरी एप्रिल व मे महिन्यात गवत जाळून शेताची स्वच्छता करतात. मार्च महिन्यात हे काम केले जात नाही. मात्र आता मार्च महिन्यातच जंगलांना आगी लागत असल्याने संपूर्ण गवत पालापाचोळा जळून जातो. ज्याच्यावर विविध प्रकारचे किटक, सरपटणारे प्राणी, जमिनीवर अंडी देणारे पक्षी, ससा, हरीण, काळवीट, निलगाय आदींसारख्या शाकाहारी प्राणी वणव्यामुळे नामशेष होत आहेत. या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे वाघ, बिबट आदीसारखे हिंस्त्र प्राणी भक्ष शोधण्यासाठी गावाकडे धाव घेतात.ज्या ग्रामसभेची हद्दित जंगलाला आग लागत असेल ती आग विझविण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामसभेची राहिल. जर आग विझविली नाही तर त्या ग्रामसभेविरूध्द कार्यवाही होणे आवश्यक आहे. संबंधित दोषी व्यक्तीवरही कारवाई व्हावी, आग लावणाऱ्याचे नाव जो सांगेत असेल त्याचे नाव गोपनिय ठेवून त्याला शासनाकडून रोख बक्षीसे देण्याची योजना अंमलात आणणे आवश्यक आहे.या गोष्टी केल्याशिवाय जंगलाला आगी लागण्याचे प्रकार बंद होणार नाही.झाडांना वाचविण्याची जबाबदारी ग्रामसभांची नाही का?मोहफुले गोळा करणारी मंडळी असो की, तेंदूपत्ता संकलन करणारी मंडळी असो, सर्वच लोक ग्रामसभा व महाग्रामसभांशी जुळलेले आहेत. तेंदूपत्ता हंगामापासून मिळणारा पैसा ग्रामसभांना मिळतो. मग जंगल जळत असेल तर तो विझविण्याची जबाबदारी ग्रामसभेची नाही का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोरची तालुक्यातील मसेली परिसरातील नवेझरी, पल्यालजोब, मुरकुटी आदीसह आठ गाव परिसरातून टॉवर लाईन जाणार आहे. परिणामी या गाव परिसरातील जेवढे वृक्ष तोडल्या जातील, त्या वृक्षाच्या मोबदल्यात या आठ ग्रामसभांना चार कोटी रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. आर्थिक लाभ होत असलेल्या ग्रामसभांची जंगल वाचविण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.