शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वणव्यामुळे मौल्यवान वनसंपत्ती होताहेत नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST

कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांपासून प्रमाण वाढले : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.मागील १० वर्षांपासून जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी मार्च महिन्यात खुटकटाई करण्यात येत होती. पण आता खुटकटाई नावापुरतीच राहिली आहे. खुट कटाईचा त्रास वाचविण्यासाठी व तेंदूच्या रोपांना जास्त खुटवे येण्याच्या मोहापायी जंगलांना चक्क आगही लावल्या जाते. मोहफूल गोळा करणारी मंडळी झाडाखालचा पालापाचोळा जाळतात. त्यामुळे ही आग पसरून वणवा लागतो.१० वर्षांपूर्वी मोहफुले गोळा करणारी मंडळी पालापाचोळा जाळीत असतात. पण त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागत नव्हती. शेतकरी शेतीची म्हशागत करण्यासाठी शेतातील गवत जाळतात. पण शेतकरी एप्रिल व मे महिन्यात गवत जाळून शेताची स्वच्छता करतात. मार्च महिन्यात हे काम केले जात नाही. मात्र आता मार्च महिन्यातच जंगलांना आगी लागत असल्याने संपूर्ण गवत पालापाचोळा जळून जातो. ज्याच्यावर विविध प्रकारचे किटक, सरपटणारे प्राणी, जमिनीवर अंडी देणारे पक्षी, ससा, हरीण, काळवीट, निलगाय आदींसारख्या शाकाहारी प्राणी वणव्यामुळे नामशेष होत आहेत. या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे वाघ, बिबट आदीसारखे हिंस्त्र प्राणी भक्ष शोधण्यासाठी गावाकडे धाव घेतात.ज्या ग्रामसभेची हद्दित जंगलाला आग लागत असेल ती आग विझविण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामसभेची राहिल. जर आग विझविली नाही तर त्या ग्रामसभेविरूध्द कार्यवाही होणे आवश्यक आहे. संबंधित दोषी व्यक्तीवरही कारवाई व्हावी, आग लावणाऱ्याचे नाव जो सांगेत असेल त्याचे नाव गोपनिय ठेवून त्याला शासनाकडून रोख बक्षीसे देण्याची योजना अंमलात आणणे आवश्यक आहे.या गोष्टी केल्याशिवाय जंगलाला आगी लागण्याचे प्रकार बंद होणार नाही.झाडांना वाचविण्याची जबाबदारी ग्रामसभांची नाही का?मोहफुले गोळा करणारी मंडळी असो की, तेंदूपत्ता संकलन करणारी मंडळी असो, सर्वच लोक ग्रामसभा व महाग्रामसभांशी जुळलेले आहेत. तेंदूपत्ता हंगामापासून मिळणारा पैसा ग्रामसभांना मिळतो. मग जंगल जळत असेल तर तो विझविण्याची जबाबदारी ग्रामसभेची नाही का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोरची तालुक्यातील मसेली परिसरातील नवेझरी, पल्यालजोब, मुरकुटी आदीसह आठ गाव परिसरातून टॉवर लाईन जाणार आहे. परिणामी या गाव परिसरातील जेवढे वृक्ष तोडल्या जातील, त्या वृक्षाच्या मोबदल्यात या आठ ग्रामसभांना चार कोटी रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. आर्थिक लाभ होत असलेल्या ग्रामसभांची जंगल वाचविण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.