शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

तुमच्या साथीला आम्ही, जहर खाऊ नको बाबा !

By admin | Updated: December 19, 2015 01:35 IST

विदर्भासह महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनोधैर्य मजबूत करण्यासाठी ...

कुरखेडा : विदर्भासह महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनोधैर्य मजबूत करण्यासाठी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी पुढाकार घेतला आहे. श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडाच्या रौप्य महोत्सवी समारोप कार्यक्रमप्रसंगी आयोजित सखे साजणी या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले,घोर मनाला लावू नको, पाठ जगाला दावू नकोतुमच्या साथीला आम्ही,आहो बाबा जहर खाऊ नकोयाच कार्यक्रमात देशाच्या वर्तमानात पुरूषांच्या बरोबरीने राखीव जागांवर महिलांनी हक्क जमविला आणि पुरूषाची राजकीय बेकारी निर्माण झाली. आता महिला घराबाहेर पडू लागल्याने पुरूषाच्या मक्तेदारीला कसा धक्का बसला, याचे चित्र प्रा. वाकुडकर यांनी आपल्या खास शैलीत रेखाटतांना ते म्हणाले,नशीब आपलं, उताण झोपलं,जीवाची फजीती ऐकाभाऊ, मर्दाला इज्जत हाय का?आता सरपंच झाल्या बायकायाशिवाय वाकुडकरांनी प्रेम श्रृंगार, राजकीय विडंबन, समाजातील अनिष्ठ व कालबाह्य परंपरा, गझल, लावणी यांच्यावरही मनसोक्त उधळण केली. तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं ईवलंस गावतुझी झेप वादळाची,माझी तुझ्यावर धावअसे सांगताना प्रेयसीचे लाजणे, दूर दूर सरणे आदी प्रेमातील बारकावे त्यांनी काव्याच्या माध्यमातून उलगडून टाकले. देशातील क्रांतिवीरांच्या फोटो शाळा, महाविद्यालय व सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर दिसत नाही. हे सांगताना ते म्हणाले,देश आझाद करण्यासाठी कोणाचे रक्त सांडले,कोण फासावर चढलेअन् पुतळे कुणाचे उभारलेएकूणच सखे साजणीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरही प्रा. वाकुडकरांनी चिंता व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)