शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: July 5, 2014 00:39 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाच्यावतीने दोन वर्षापूर्वी विहीर ...

दिलीप दहेलकर गडचिरोलीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाच्यावतीने दोन वर्षापूर्वी विहीर व नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले. या कामापोटी प्रकल्प कार्यालयाने जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला ४ कोटी रूपये अदा केले आहेत. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात आहे. परिणामी पाण्याअभावी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी जंगलालगत उघड्यावरच शौचास बसत आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने २०११-१२ मध्ये १३ शासकीय आश्रमशाळांमध्ये विहिरीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. यात रांगी, कारवाफा, पेंढरी, सोडे, सोनसरी, मुरूमगाव, गोडलवाही, येरमागड, भाकरोंडी, कुरंडीमाल, घाटी, कोरची आदी आश्रमशाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विहीर बांधकामाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आली. या बांधकामाचे करारनामे करून प्रकल्प कार्यालयाने सुरूवातीला २ कोटी व त्यानंतर २ कोटी असे ४ कोटी रूपये पाणी पुरवठा विभागाला अदा केले. या विभागाने विहिरींचे बांधकाम सुरू केले. मात्र बहुतांश विहिरींचे काम अद्यापही अपूर्णच आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या विहिरींचा उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे या पूर्ण झालेल्या विहिरी उपयोगात आणल्या जात नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. प्रकल्प कार्यालयाकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या माहितीच्या अहवालानुसार विहिरींच्या कामांसाठी १ कोटी ६५ लाख ६५४ रूपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. करारनामेनुसार या सर्व विहिरींचे कामे २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात करायची होती. मात्र या विहिरींचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकांना उन्हाळ्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. २०१२-१३ मध्ये आदिवासी विकास विभागाने गडचिरोली प्रकल्पातील १५ शासकीय आश्रमशाळांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली. यामध्ये रांगी, कारवाफा, पेंढरी, सोडे, गोडलवाही, गॅरापत्ती, मसेली, कोरची, कोटगुल, घाटी, आदिवासी मुलींचे वसतीगृह गडचिरोली, आश्रमशाळा रेगडी, भाडभिडी, पोटेगाव, व्यंकटापूर, जारावंडी, जिमलगट्टा आदी आश्रमशाळांचा समावेश आहे. सदर काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले. करारनामा करून या कामासाठीही प्रकल्प कार्यालयाने पाणी पुरवठा विभागाला निधी अदा केला आहे. पाणी पुरवठा विभागाने या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले. याकरीता ११७.३० लक्ष रूपये खर्च झाल्याचा अहवाल पाणी पुरवठा विभागाने प्रकल्प कार्यालयाला सादर केला आहे. मात्र एकाही शासकीय आश्रमशाळेतील पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नाही. सर्वच कामे अर्धवट आहे. या कामात गती नसल्याचे आढळून आले आहे.