शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: July 5, 2014 00:39 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाच्यावतीने दोन वर्षापूर्वी विहीर ...

दिलीप दहेलकर गडचिरोलीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाच्यावतीने दोन वर्षापूर्वी विहीर व नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले. या कामापोटी प्रकल्प कार्यालयाने जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला ४ कोटी रूपये अदा केले आहेत. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात आहे. परिणामी पाण्याअभावी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी जंगलालगत उघड्यावरच शौचास बसत आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने २०११-१२ मध्ये १३ शासकीय आश्रमशाळांमध्ये विहिरीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. यात रांगी, कारवाफा, पेंढरी, सोडे, सोनसरी, मुरूमगाव, गोडलवाही, येरमागड, भाकरोंडी, कुरंडीमाल, घाटी, कोरची आदी आश्रमशाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विहीर बांधकामाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आली. या बांधकामाचे करारनामे करून प्रकल्प कार्यालयाने सुरूवातीला २ कोटी व त्यानंतर २ कोटी असे ४ कोटी रूपये पाणी पुरवठा विभागाला अदा केले. या विभागाने विहिरींचे बांधकाम सुरू केले. मात्र बहुतांश विहिरींचे काम अद्यापही अपूर्णच आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या विहिरींचा उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे या पूर्ण झालेल्या विहिरी उपयोगात आणल्या जात नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. प्रकल्प कार्यालयाकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या माहितीच्या अहवालानुसार विहिरींच्या कामांसाठी १ कोटी ६५ लाख ६५४ रूपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. करारनामेनुसार या सर्व विहिरींचे कामे २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात करायची होती. मात्र या विहिरींचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकांना उन्हाळ्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. २०१२-१३ मध्ये आदिवासी विकास विभागाने गडचिरोली प्रकल्पातील १५ शासकीय आश्रमशाळांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली. यामध्ये रांगी, कारवाफा, पेंढरी, सोडे, गोडलवाही, गॅरापत्ती, मसेली, कोरची, कोटगुल, घाटी, आदिवासी मुलींचे वसतीगृह गडचिरोली, आश्रमशाळा रेगडी, भाडभिडी, पोटेगाव, व्यंकटापूर, जारावंडी, जिमलगट्टा आदी आश्रमशाळांचा समावेश आहे. सदर काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले. करारनामा करून या कामासाठीही प्रकल्प कार्यालयाने पाणी पुरवठा विभागाला निधी अदा केला आहे. पाणी पुरवठा विभागाने या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले. याकरीता ११७.३० लक्ष रूपये खर्च झाल्याचा अहवाल पाणी पुरवठा विभागाने प्रकल्प कार्यालयाला सादर केला आहे. मात्र एकाही शासकीय आश्रमशाळेतील पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नाही. सर्वच कामे अर्धवट आहे. या कामात गती नसल्याचे आढळून आले आहे.