शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

मोटद्वारे शेतीला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:51 IST

सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा व असरअल्ली भागात शासनाकडून फारशा सिंचन सुविधा करण्यात आल्या नाही.

ठळक मुद्देपीक वाचविण्याची धडपड : सिरोंचा तालुक्यात सिंचन सुविधेचा अभाव

आॅनलाईन लोकमतअंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा व असरअल्ली भागात शासनाकडून फारशा सिंचन सुविधा करण्यात आल्या नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने मोटद्वारे आपल्या शेतीला पाणीपुरवठा करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड दिसून येते.अंकिसापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आसरअल्ली येथील राष्ट्रीय महामार्गालगत शेतकरी बाजारू मल्लूमेरा आदे यांची अर्धा एकर शेती आहे. त्यांनी या शेतीत कांदे व रताळे व इतर पिकांची लागवड केली आहे. मात्र आता उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे, अशा परिस्थितीत बैलांच्या सहाय्याने मोटद्वारे विहिरीतील पाणी पिकांना दिले जात आहे. या कामात वयोवृद्ध शेतकरी बाजारू आदे यांना त्यांची पत्नी लसमम्मा या सहकार्य करीत आहेत.शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बोअर खोदण्याकरिता शेतकरी आदे यांच्याकडे आर्थिक पुंजी नाही. तसेच शासकीय योजनेतून आदे यांना बोअरचा लाभ मिळाला नाही. अशीच स्थिती अंकिसा भागातील अनेक शेतकऱ्यांची आहे.