शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा आॅक्सीजनवर

By admin | Updated: July 15, 2014 00:00 IST

येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने याचा फटका या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे.

रिक्त पदे : अहेरी ग्रामीण पाणीपुरवठा विभागअहेरी : येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने याचा फटका या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. अहेरी परिसरातील पाणीपुरवठा योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहेरी येथे उपविभागीय पाणीपुरवठा कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने दुसऱ्या पाणीपुरवठा योजनांवर नियंत्रण ठेवण्याचे सोडाच या कार्यालयाचे स्वत:वरच नियंत्रण राहिलेले नाही. उपविभागीय अधिकारी म्हणून पी. आर. मडावी हे कार्यरत आहेत. मात्र ते कार्यालयात नेमके कधी येतात व कधी जातात, याचा पत्ताच या कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना लागत नाही. एखाद्या नागरिकाने मडावी यांच्याबद्दल चौकशी केल्यास ते दौऱ्यावर आहेत किंवा बैठकीसाठी गडचिरोली, नागपूर येथे गेले आहेत, असे उत्तर येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते. त्यामुळे आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. महत्वाचे म्हणजे ते अहेरी येथे मुख्यालयी न राहता चंद्रपूर येथून ये-जा करतात. जिल्हा परिषदेमध्ये १२ वर्षापूर्वी पाणीपुरवठा विभाग सुरू झाला. तेव्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी काही कर्मचारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळाले.सध्य:स्थितीत या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची ६ पदे रिक्त आहेत. ४ कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. यापैकी २ पदे नियमित असून २ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. कनिष्ठ लिपिकाचे ३ पदे मंजूर आहेत, तिनही पदे रिक्त आहेत. परिचराच्या २ पदांपैकी १ पद रिक्त आहे. रिक्त पदांमुळे कामाचा खोळंबा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने काही कर्मचारी परत घेतल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे.लिपिकाचे पदे रिक्त असल्याने कनिष्ठ अभियंता जे. जी. भलावी यांना लिपिकाचे काम करावे लागत आहे. संगणकाची सुविधा उपलब्ध नाही. कनिष्ठ अभियंता स्वत:च्या लॅपटॉपवरून अतिमहत्वाची कामे व पत्र व्यवहार करीत आहेत. कार्यालयात असलेल्या वॉलमॅन यांना लिपिकाचे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षीच नवनवीन पाणीपुरवठा योजना बांधल्या जातात. त्यामुळे या विभागाच्या जबाबदारीत दरवर्षी भर पडत आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन वेळेवर मिळत नाही. परिणामी अहेरी उपविभागातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)