शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आलापल्लीसह नऊ गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: August 22, 2015 01:49 IST

प्रादेशिक पाणीपुरवठा केंद्राच्या शुद्धीकरण केंद्रात जवळपास आठ फूट एवढा प्रचंड गाळ साचल्याने सदर योजना मागील सात दिवसांपासून बंद पडली आहे.

सात दिवसांपासून पाणी संकट : शुद्धीकरण केंद्रात आठ फुटांचा गाळअहेरी : प्रादेशिक पाणीपुरवठा केंद्राच्या शुद्धीकरण केंद्रात जवळपास आठ फूट एवढा प्रचंड गाळ साचल्याने सदर योजना मागील सात दिवसांपासून बंद पडली आहे. परिणामी आलापल्लीसह नऊ गावांचा पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली, चेरपल्ली, कोत्तूर, गडअहेरी, भुजंगराव पेठा, वांगेपल्ली, किष्टापूर, चिंचगुंडी या गावांना अहेरी प्रादेशिक पाणीपुरवठा केंद्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी गढूळ येत असल्याने शुद्धीकरण केंद्रात या कालावधीत सर्वाधिक गाळ जमा होते. त्यामुळे त्याचा एका नियमित कालावधीनंतर उपसा करणे आवश्यक होते. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ उपसला नाही. परिणामी आठ ते नऊ फूट उंचीचा गाळाचा थर शुद्धीकरण केंद्राच्या टाक्यांमध्ये जमा झाला आहे. गाळ साचल्याने मागील सात दिवसांपासून आलापल्लीसह इतर नऊ गावांचा पाणीपुरवठा ठप्प पडला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या गावांमध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना विहीर व हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र तत्काळ सुरू करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अहेरीचे प्रभारी उपविभागीय अभियंता जी. डी. बारापात्रे यांना विचारणा केली असता, मजूर लावून गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)