शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली शहराचा पाणीपुरवठा बंदच राहणार

By admin | Updated: March 6, 2016 01:04 IST

आलापल्ली ग्रामपंचायतीकडे सुमारे २६ लाख ५८ हजार ९०२ रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या थकीत पाणीपट्टीमुळे पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे.

२६ लाखांची पाणीपट्टी थकीतअहेरी : आलापल्ली ग्रामपंचायतीकडे सुमारे २६ लाख ५८ हजार ९०२ रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. या थकीत पाणीपट्टीमुळे पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे पाणी योजना दुरूस्त होऊनही आलापल्ली शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता जी. डी. बारापात्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. आलापल्लीसह गेर्रा, वांगेपल्ली, क्रिष्णापूर, चिचगुडी, चेरपल्ली, गडअहेरी, गुप्पा या आठ गावांना ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या मार्फतीने पाणीपुरवठा केला जातो. विद्युत रोहित्रावर वीज कोसळल्याने चार दिवसांपासून सदर पाणीपुरवठा योजना बंद पडली होती. त्यामुळे पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला होता. परिणामी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेऊन रोहित्र दुरूस्त केला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा शनिवारी पूर्ववत झाला. रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे. मात्र हा पाणीपुरवठा आलापल्ली वगळता इतर सात गावांना केला जाणार आहे. आलापल्ली ग्रामपंचायतीकडे मागील अनेक वर्षांपासून पाणीपट्टी कर थकीत आहे. पाणीपट्टीची रक्कम भरण्यात यावी, याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतीला अनेकवेळा पत्र लिहिले आहे. मात्र पाणीपट्टी भरण्याबाबत ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही. यापूर्वी १४ जानेवारी रोजी नोटीस पाठवून २५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत या कार्यालयास थकीत पाणीपट्टी भरण्यात यावी, अन्यथा २६ फेबु्रवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. अचानक पावसामुळे रोहित्र जळाल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडली होती. सदर योजना शनिवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र आलापल्ली शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार आहे. याबाबत आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे यांना विचारणा केली असता, थकलेली पाणीपट्टी दोन वर्षांपूर्वीचे आहे. टप्प्याटप्याने पाणीपट्टीचा भरणा केला जाईल. पाणी ही अत्यावश्यक गरज असल्याने पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी प्रतिक्रिया लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)