शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाणीटंचाई दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:28 IST

दरवर्षीच्या उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न जटील होत असतो. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडचिरोली पालिकेच्या वतीने दोन वॉर्डात नवीन पाणी टाकी व नळ पाईपलाईन तसेच शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देपालिकेने निविदा मागविल्या : गडचिरोलीत कोट्यवधींच्या नळ योजनेचे काम होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षीच्या उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न जटील होत असतो. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडचिरोली पालिकेच्या वतीने दोन वॉर्डात नवीन पाणी टाकी व नळ पाईपलाईन तसेच शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सदर तिन्ही मोठी कामे झाल्यानंतर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यादृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत.पालिका प्रशासनाच्या वतीने येथील सुभाष वार्ड व फुले वॉर्डासाठी पाच लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी व नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आलले आहे. या कामासाठी शासनाकडून पालिकेला २ कोटी ६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून निविदा मागविल्या आहेत. प्रशासनाकडे तीन ते चार निविदा प्राप्त झाल्या असून येत्या तीन-चार दिवसात सदर कामाचे संबंधित कंत्राटदारांना वर्कआदेश देण्यात येणार आहे. पाणी योजनेच्या संदर्भात राज्याच्या नगर विकास विभागाने अलीकडेच एक शासन निर्णय काढून ९.९९ अधिक दर कामाला द्या, असे पालिकेला सुचित केले आहे. सध्याच्या सीएसआरनुसार वाढत्या दराने नगर विकास विभागाने पाणी योजनेच्या कामात बदल केला आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. लवकरच या पाणी टाकीचे काम सुरू होणार असून शहराच्या सुभाष व फुले वार्डातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.विसापूर, विसापूर टोली हा चढ भाग असल्याने येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होतो. पालिकेच्या वतीने उन्हाळ्यात विसापूर या एकमेव भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या वतीने विसापूर भागात पाच लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी व नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले. यासाठी पालिकेला २ कोटी १६ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. पालिकेच्या वतीने या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे.प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर पालिकेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.४५ कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तावितशहरातील अनेक वॉर्डातील नळ पाईपलाईन फार जुनी आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. परिणामी शहरात पाण्याचे असमान वाटप होते. यातून उन्हाळ्यात बऱ्याच कुटुंबांना पुरेशे पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल ४५ कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर या बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासन व महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. सदर योजनेसाठी जिल्हा विकास निधीतून पालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालिकेच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.दोन टाक्यांचे होणार बांधकाम४५ कोटी रूपयांच्या निधीतून वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात दोन नवीन पाणीटाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये गोकुलनगर भागात सात लाख लिटर क्षमतेची व इंदिरा गांधी चौक परिसरात १४ लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार आहे. याशिवाय बोरमाळा मार्गावरील फिल्टर प्लान्टवर एक अतिरिक्त पंप बसविण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत अधिक क्षमतेची मोठी पाईपलाईन शहरात बसविण्यात येणार आहे. दरम्यान सर्व शहराचे झोन पाडून नवे वॉल्व बसविण्यात येणार आहे. जुन्या पाईपलाईनच्या ठिकाणी १०३ किमी अंतरावर नवी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व बाबी प्रस्तावात नमूद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी