शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

भामरागड तालुक्यात पाणीटंचाई

By admin | Updated: April 6, 2016 01:35 IST

भामरागड तालुक्यात पामुलगौतम, पर्लकोटा, इंद्रावती व बांडिया या प्रमुख चार नद्या आहेत.

नदी-नाले कोरडे : पाळीव व वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंतीभामरागड : भामरागड तालुक्यात पामुलगौतम, पर्लकोटा, इंद्रावती व बांडिया या प्रमुख चार नद्या आहेत. मात्र यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने सदर नद्या कोरडया पडल्या असून नाले तसेच तलावही आटलेले आहेत. भामरागडची नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भामरागड तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पाळीव जनावरांसह वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भामरागड तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. तालुक्यातील जलस्त्रोत यंदा आटल्यामुळे अनेक गावातील नागरिक हातपंपाचे पाणी पाळीव जनावरांना पाजत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तालुक्यात पाळीव जनावरांची संख्या मोठी असल्याने हातपंपाचे पाणी जनावरांसाठी कमी पडत आहे. परिणामी पशुपालक उन्हाळ्यात प्रचंड त्रस्त झाले आहेत. सकाळच्या सुमारास जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. भामरागड तालुक्यात बोटावर मोजण्याइतकेच माजी मालगुजारी तलाव आहेत. मात्र सदर तलाव यंदा मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने पाणीटंचाईचा भीषण प्रश्न नागरिकांसह जनावरांपुढे निर्माण झाला आहे. तालुक्यात अर्ध्यापेक्षा जास्त गावांमध्ये पाण्याअभावी पशुधन धोक्यात आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने विचार करून पाळीव जनावरे व वन्य प्राण्यांसाठी तसेच नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याची सुविधा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी) अनेक हातपंप नादुरूस्त; विहिरींची दुरवस्थाभामरागड तालुक्यात अनेक गावातील हातपंप बंद आहेत. तसेच काही हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत. सध्या सूर्य आग ओकत असल्याने वाढत्या उष्णतामानामुळे माणसाच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची गरज प्रचंड वाढत आहे. भामरागड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक विहिरी आहेत. मात्र पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक सार्वजनिक विहिरींची चार ते पाच वर्षात दुरूस्तीच झाली नाही. या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. एकूणच भामरागड तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र होत आहे.