शहरं
Join us  
Trending Stories
1
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
2
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
3
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
4
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
5
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
6
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
7
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
8
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
9
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
10
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
11
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
12
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
13
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
14
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
15
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
16
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
17
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
18
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
19
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
20
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाई

By admin | Updated: March 28, 2017 00:38 IST

नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे.

दोन दिवसाआड मिळते पाणी : आरमोरीतील महिलांची पाण्यासाठी भटकंती; नगरपंचायतीचे दुर्लक्षआरमोरी : नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप बंद असल्याने उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच आरमोरी शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. आरमोरी शहरातील बाजारपेठ, ताडुरवारनगर, शास्त्रीनगर, भगतसिंग चौकातील भाग, काळागोटा आदी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळा तापत असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता नागरिकांवर पिण्याचे मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत मागणीकडे नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक वार्डातील हातपंप नादुरूस्त आहेत. तर काही हातपंपांमधून दोन ते तीन गुंड पाणी भरल्यावर हातपंपावर पाणीच येत नाही, अशी अवस्था आहे. हातपंप दुरूस्तीकरिता विविध वार्डातून यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन सूचना करूनही तांत्रिक अडचणी समोर करून नगर पंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. शहरातील बहुतांश वार्डांना दोन दिवसांतून एकदाच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच घरगुती पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. नागरिकांना पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हे नगर पंचायतीची जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. शहरातील शेगाव तसेच इतर अनेक भागातील नागरिकांनी नळ जोडणीची मागणी करूनही नगर पंचायतीचे पाणी या भागात पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्या संर्भात अनेक समस्या आहेत. नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. (वार्ताहर)टिल्लू पंपांकडे दुर्लक्षशहरातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावतात. त्यामुळे बहुतांश नळधारकांना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. टिल्लूपंप हे अवैध असून सदर पंपधारकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायतीचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील पाण्याची समस्या सोडण्यिासाठी नगर पंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांनी दिला आहे.