शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाई

By admin | Updated: March 28, 2017 00:38 IST

नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे.

दोन दिवसाआड मिळते पाणी : आरमोरीतील महिलांची पाण्यासाठी भटकंती; नगरपंचायतीचे दुर्लक्षआरमोरी : नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप बंद असल्याने उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच आरमोरी शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. आरमोरी शहरातील बाजारपेठ, ताडुरवारनगर, शास्त्रीनगर, भगतसिंग चौकातील भाग, काळागोटा आदी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळा तापत असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता नागरिकांवर पिण्याचे मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत मागणीकडे नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक वार्डातील हातपंप नादुरूस्त आहेत. तर काही हातपंपांमधून दोन ते तीन गुंड पाणी भरल्यावर हातपंपावर पाणीच येत नाही, अशी अवस्था आहे. हातपंप दुरूस्तीकरिता विविध वार्डातून यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन सूचना करूनही तांत्रिक अडचणी समोर करून नगर पंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. शहरातील बहुतांश वार्डांना दोन दिवसांतून एकदाच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच घरगुती पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. नागरिकांना पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हे नगर पंचायतीची जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. शहरातील शेगाव तसेच इतर अनेक भागातील नागरिकांनी नळ जोडणीची मागणी करूनही नगर पंचायतीचे पाणी या भागात पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्या संर्भात अनेक समस्या आहेत. नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. (वार्ताहर)टिल्लू पंपांकडे दुर्लक्षशहरातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावतात. त्यामुळे बहुतांश नळधारकांना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. टिल्लूपंप हे अवैध असून सदर पंपधारकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायतीचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील पाण्याची समस्या सोडण्यिासाठी नगर पंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांनी दिला आहे.