शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाई

By admin | Updated: March 28, 2017 00:38 IST

नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे.

दोन दिवसाआड मिळते पाणी : आरमोरीतील महिलांची पाण्यासाठी भटकंती; नगरपंचायतीचे दुर्लक्षआरमोरी : नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप बंद असल्याने उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच आरमोरी शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. आरमोरी शहरातील बाजारपेठ, ताडुरवारनगर, शास्त्रीनगर, भगतसिंग चौकातील भाग, काळागोटा आदी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळा तापत असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता नागरिकांवर पिण्याचे मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत मागणीकडे नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक वार्डातील हातपंप नादुरूस्त आहेत. तर काही हातपंपांमधून दोन ते तीन गुंड पाणी भरल्यावर हातपंपावर पाणीच येत नाही, अशी अवस्था आहे. हातपंप दुरूस्तीकरिता विविध वार्डातून यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन सूचना करूनही तांत्रिक अडचणी समोर करून नगर पंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. शहरातील बहुतांश वार्डांना दोन दिवसांतून एकदाच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच घरगुती पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. नागरिकांना पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हे नगर पंचायतीची जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. शहरातील शेगाव तसेच इतर अनेक भागातील नागरिकांनी नळ जोडणीची मागणी करूनही नगर पंचायतीचे पाणी या भागात पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्या संर्भात अनेक समस्या आहेत. नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. (वार्ताहर)टिल्लू पंपांकडे दुर्लक्षशहरातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावतात. त्यामुळे बहुतांश नळधारकांना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. टिल्लूपंप हे अवैध असून सदर पंपधारकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायतीचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील पाण्याची समस्या सोडण्यिासाठी नगर पंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांनी दिला आहे.