शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

रोवणीसाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडले

By admin | Updated: July 26, 2015 02:40 IST

मृग नक्षत्रात चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तब्बल एक ते दीड महिना पावसाने दडी मारली.

मजुरांची लगबग : चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत ७०० मिमी पाऊसचामोर्शी : मृग नक्षत्रात चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तब्बल एक ते दीड महिना पावसाने दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले धानाचे पऱ्हे पाण्याअभावी करपायला लागले. तसेच पावसाअभावी रोवणीचे कामे खोळंबले होते. चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाकडे रोवणीच्या कामासाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी केली. अखेर सिंचाई विभागाने गुरूवारपासून शेतकऱ्यांच्या रोवणीच्या कामासाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडणे सुरू केले आहे. यामुळे रेगडी परिसरातील धान पिकाच्या रोवणीला वेग आला आहे. जुलै महिन्यात काही दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मधल्या आठवड्यात तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाला. तसेच नदीजवळ असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्ह्यांना पाणीपुरवठा करून रोवणीची कामे हाती घेतली आहे. तर काही शेतकरी तळे, बोडी, नाले व विहिर आदी स्त्रोतातून मोटारपंपने पाणीपुरवठा करून रोवणीची कामे सुरू केली आहे.यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात चामोर्शी तालुक्यातील जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी धानाच्या संकरित वाणाची लागवड केली आहे. मात्र काही भागात धानपिकाच्या पऱ्ह्यांवर लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यंदा दोन टप्प्यात रोवणीचे काम होणार असल्याची शक्यता आहे. चामोर्शी तालुक्यात जून महिन्यापासून तर आतापर्यंत एकूण सरासरी ७०० मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. (शहर प्रतिनिधी)