शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली गावात पाण्याचा दुष्काळ

By admin | Updated: March 19, 2017 01:55 IST

अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा योजनेचा

सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा योजना बंद : अहेरीवरून नेतात नागरिक पाणी अहेरी : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद असून नागरिकांना सात किमी अंतरावर असलेल्या अहेरी येथून पिण्याचे पाणी चारचाकी वाहनाने नेऊन तहाण भागवावी लागत आहे. आलापल्ली हे शहरवजा लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या १० हजारांच्या जवळपास आहे. गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. सदर योजना जीवण प्राधिकरण विभागाच्या मार्फतीने चालविली जाते. ग्रामपंचायत नियमितपणे वीज बिल भरत नसल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठा बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील वर्षीच्या उन्हाळ्यातही येथील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर ग्रामपंचायतीने काही प्रमाणात बिल भरले होते व त्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा सुरू झाला होता. आणखी आॅक्टोबर २०१६ मध्ये ग्रामपंचायतीने विद्युत बिलाचे ९४ हजार रूपये भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. तेव्हापासून पाणी पुरवठा बंद आहे. आलापल्लीवासीयांना हातपंप, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही नागरिक विहीर व हातपंपाच्या पाण्याने आरोग्य बिघडेल या भितीने खासगी वाहनांच्या मदतीने अहेरी येथून पाणी नेतात. उन्हाळ्यात आलापल्ली येथील बहुतांश विहिरी आटत असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)