शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आलापल्ली गावात पाण्याचा दुष्काळ

By admin | Updated: March 19, 2017 01:55 IST

अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा योजनेचा

सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा योजना बंद : अहेरीवरून नेतात नागरिक पाणी अहेरी : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद असून नागरिकांना सात किमी अंतरावर असलेल्या अहेरी येथून पिण्याचे पाणी चारचाकी वाहनाने नेऊन तहाण भागवावी लागत आहे. आलापल्ली हे शहरवजा लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या १० हजारांच्या जवळपास आहे. गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. सदर योजना जीवण प्राधिकरण विभागाच्या मार्फतीने चालविली जाते. ग्रामपंचायत नियमितपणे वीज बिल भरत नसल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठा बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील वर्षीच्या उन्हाळ्यातही येथील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर ग्रामपंचायतीने काही प्रमाणात बिल भरले होते व त्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा सुरू झाला होता. आणखी आॅक्टोबर २०१६ मध्ये ग्रामपंचायतीने विद्युत बिलाचे ९४ हजार रूपये भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. तेव्हापासून पाणी पुरवठा बंद आहे. आलापल्लीवासीयांना हातपंप, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही नागरिक विहीर व हातपंपाच्या पाण्याने आरोग्य बिघडेल या भितीने खासगी वाहनांच्या मदतीने अहेरी येथून पाणी नेतात. उन्हाळ्यात आलापल्ली येथील बहुतांश विहिरी आटत असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)