शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

आलापल्ली गावात पाण्याचा दुष्काळ

By admin | Updated: March 19, 2017 01:55 IST

अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा योजनेचा

सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा योजना बंद : अहेरीवरून नेतात नागरिक पाणी अहेरी : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद असून नागरिकांना सात किमी अंतरावर असलेल्या अहेरी येथून पिण्याचे पाणी चारचाकी वाहनाने नेऊन तहाण भागवावी लागत आहे. आलापल्ली हे शहरवजा लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या १० हजारांच्या जवळपास आहे. गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. सदर योजना जीवण प्राधिकरण विभागाच्या मार्फतीने चालविली जाते. ग्रामपंचायत नियमितपणे वीज बिल भरत नसल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठा बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील वर्षीच्या उन्हाळ्यातही येथील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर ग्रामपंचायतीने काही प्रमाणात बिल भरले होते व त्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा सुरू झाला होता. आणखी आॅक्टोबर २०१६ मध्ये ग्रामपंचायतीने विद्युत बिलाचे ९४ हजार रूपये भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. तेव्हापासून पाणी पुरवठा बंद आहे. आलापल्लीवासीयांना हातपंप, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही नागरिक विहीर व हातपंपाच्या पाण्याने आरोग्य बिघडेल या भितीने खासगी वाहनांच्या मदतीने अहेरी येथून पाणी नेतात. उन्हाळ्यात आलापल्ली येथील बहुतांश विहिरी आटत असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)